मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट

सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तर निवडा. सबमिट करा → स्कोअर पहा.

प्रश्न 1

महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

प्रश्न 2

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे?

प्रश्न 3

महाराष्ट्राचा राज्य फूल कोणते आहे?

प्रश्न 4

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

प्रश्न 5

महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे?

प्रश्न 6

महाराष्ट्राचा राज्य गीत कोणते आहे?

प्रश्न 7

महाराष्ट्राचा राज्य नृत्य कोणते आहे?

प्रश्न 8

महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे?

प्रश्न 9

महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता आहे?

प्रश्न 10

महाराष्ट्राचा राज्य कीटक कोणता आहे?

प्रश्न 11

महाराष्ट्राचा राज्य चिन्ह काय आहे?

प्रश्न 12

महाराष्ट्राचा राज्य फळ कोणते आहे?

प्रश्न 13

महाराष्ट्राचा राज्य भाषा कोणती आहे?

प्रश्न 14

महाराष्ट्राचा राज्य नृत्य शैली कोणती आहे?

प्रश्न 15

महाराष्ट्राचा राज्य संगीत प्रकार कोणता आहे?

प्रश्न 16

महाराष्ट्राचा राज्य क्रीडा प्रकार कोणता आहे?

प्रश्न 17

महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता आहे?

प्रश्न 18

महाराष्ट्राचा राज्य चिन्ह कशावर आधारित आहे?

प्रश्न 19

महाराष्ट्राचा राज्य फळ कोणते आहे?

प्रश्न 20

महाराष्ट्राचा राज्य कॅलेंडर कोणता आहे?

भारताचे राष्ट्रीय प्रतीके आधारित टेस्ट

भारताचे राष्ट्रीय प्रतीके टेस्ट

भारताचे राष्ट्रीय प्रतीके टेस्ट

सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तर निवडा. सबमिट करा → स्कोअर पहा.

प्रश्न 1

भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाइन केला?

प्रश्न 2

भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला गेला?

प्रश्न 3

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मध्यभागी कोणता चक्र आहे?

प्रश्न 4

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

प्रश्न 5

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

प्रश्न 6

भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे?

प्रश्न 7

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?

प्रश्न 8

भारताचा राष्ट्रीय फळ कोणते आहे?

प्रश्न 9

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

प्रश्न 10

भारताचा राष्ट्रीय नदी कोणती आहे?

प्रश्न 11

भारताचा राष्ट्रीय गीत कोणते आहे?

प्रश्न 12

भारताचा राष्ट्रीय संगीत कोणते आहे?

प्रश्न 13

भारताचा राष्ट्रीय चिन्ह (Emblem) कोणता आहे?

प्रश्न 14

भारताचा राष्ट्रीय चिन्ह कधी स्वीकारला गेला?

प्रश्न 15

भारताचा राष्ट्रीय रंग कोणता मानला जातो?

प्रश्न 16

भारताचा राष्ट्रीय कॅलेंडर कोणता आहे?

प्रश्न 17

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

प्रश्न 18

भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे?

प्रश्न 19

भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य कोणते आहे?

प्रश्न 20

भारताचा राष्ट्रीय पंचांग कोणता आहे?

भारतरत्न इंदिरा गांधी..

 


        *भारतरत्न इंदिरा गांधी*

  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)

     *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*

            (मुघलसराई)

   *मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४*

        ( नवी दिल्ली, भारत)

          *कार्यकाळ*

जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४


              *राष्ट्रपती*

नीलम संजीव रेड्डी

झैल सिंग

मागील : चौधरी चरण सिंग

पुढील : राजीव गांधी


               *कार्यकाळ*

जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७


                *राष्ट्रपती*

सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : मोरारजी देसाई


*भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

मागील : पी.व्ही. नरसिंहराव

पुढील : राजीव गांधी


            *कार्यकाळ*

ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९

मागील : एम.सी. छगला

पुढील : दिनेश सिंह


*भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ*

जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१

मागील : मोरारजी देसाई

पुढील : यशवंतराव चव्हाण


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      कांग्रेस

पती : फिरोज गांधी

अपत्ये : राजीव गांधी आणि 

             संजय गांधी

निवास : १, सफदरजंग रोड, 

              नवी दिल्ली

धर्म : हिंदू

चिरविश्रांती : शक्तीस्थळ


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.


लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.


इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.


१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.


💁🏻‍♀️ *बालपण*

           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.

 

👫 *फिरोज गांधींसोबत विवाह*

             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.


💠 *राजकारणातला प्रवास*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद*

           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.


📺 *माहिती व नभोवाणी मंत्री*

                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.


पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.


👩‍🦰 *पंतप्रधान* ⚜️

                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.


जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.


💣 *१९७१ चे भारत पाक युद्घ*

                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.


📝 *इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक*

इंदर मल्होत्रा

उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)

कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

डॉम मोराईस (मिसेस गांधी)

पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)

पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)

प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)

सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

 

📕 *इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके*

               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)

दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)


🔲 *टपालाचे तिकीट*

                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

                      

          

सरदार वल्लभ भाई पटेल..

                                          

            *भारतरत्न लोहपुरुष* 

      *सरदार वल्लभ भाई पटेल*

*(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)*


   *जन्म : 31 अक्टोबर 1875*

(नडियाद, बंबई प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत)

     *मृत्यु :15 डिसेंबर 1950* 

                   (वय 75)

वडिल : झावेरभाई पटेल

आई : लाडबाई

पत्नी : झावेरबा

मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल 

शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड

पुस्तक : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल  के संग्रहित कार्य, 15 खंड

स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी     *भारताचे उप-प्रधानमंत्री*

                *पद बहाल*

15 अॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : मोरारजी देसाई

            *गृह मंत्रालय*

             *पद बहाल*

15 अॕॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : चक्रवर्ती  

                       राजगोपालाचारी

🔸 *वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन*

वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विðलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.


👫🏻 *वल्लभभाई पटेल यांचा विवाह*

            त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.


♦️ *पत्नीच्या मृत्युची बातमी ऐकुन देखील कोर्टात करत राहीले कामकाज*

        वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.

                  ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.


💁🏻‍♂️ *वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात*

       आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.

               घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणा-या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.

            1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.

        त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.


🔆 *वल्लभभाई गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले*

          पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.

🔸 *वल्लभभाई पटेलांची राजकिय कारकिर्द*

⚜️ *स्वातंत्र्य संग्रामात सरदार वल्लभभाई पटेलांची भुमिका*

                  भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.

                    सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


🔮 *शेतकरी संघर्षात वल्लभभाईंची महत्वाची भुमिका*

                    महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.

                  परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.

                   या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.                               ♦️ *महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासमवेत सर्व आंदोलनांना सरदार वल्लभ भाई पटेलांनी दिले समर्थन*   

वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली.

                  याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.

 *अशी मिळाली सरदार ही पदवी*

                     आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणा-या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.

               या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.


🌀 *काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास*

                     दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.

             1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.

           या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.


♨️ *स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका*

                स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.

              त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.

          वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.


🔰 *सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन*

                   फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.

               सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.

                  या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.


🪔 *निधन* 

                    1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.


📜 *सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान*

       1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.


या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की


सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ

सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत

सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात

सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली

सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद

स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद

सरदार सरोवर बांध, गुजरात

सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद

🎯 *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप*

▪️1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले

▪️1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.           ▪️ 1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले.

▪️1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.

▪️ 1919 साली रौलेट अॕक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला

▪️ 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात वल्लभभाईंनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पीत केले. प्रत्येक महिन्याला हजारो कमवुन देणारी वकिली देखील त्यांनी देशाकरता सोडुन दिली.

▪️ 1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.

▪️1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.

▪️1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.

▪️1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.

▪️1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.

▪️1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.

▪️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली.                                 ▪️वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.                                           🎞️📽️ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट*

                    1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.


🗽 *स्टैच्यू ऑफ यूनिटी*

       लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.

                    अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.

 

         

पोलीस शिपाई भरती पुणे 2024 ..25


 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) शिपाई नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक १७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १७०० व बॅण्ड्समन करीता ३३ अशी एकूण १७३३ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.



चालक पोलीस शिपाई भरती 2025

 महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७/१०/२०२५ च्या आदेशांन्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १०५ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.






केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025..

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई ) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील १३२ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर सीबीएसईतर्फे सीटीईटी ही परीक्षा घेण्यात येते. सीबीएसईतर्फे वर्षातून दोनवेळा परीक्षेचे आयोजन केले जाते. उमेदवारांना शिक्षक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होता येते. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सीटीईटीमध्ये पेपर १ आणि पेपर २ चा समावेश असणार आहे. एकूण २० भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

रासायनिक मूलद्रव्य आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि संज्ञा टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

1. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Ag
Au
Fe
Cu
2. हायड्रोजनचे रासायनिक चिन्ह काय?
O
H
N
He
3. ऑक्सिजनचे आण्विक क्रमांक किती आहे?
6
7
8
9
4. कार्बनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
C
Ca
Cu
Co
5. लोहाचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Fe
F
Pb
Al
6. पाऱ्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mg
Hg
Mn
Mo
7. तांब्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Cu
Co
Cr
Ca
8. शिसे या धातूचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Pb
Pt
Pd
Po
9. चांदीचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Si
Ag
Au
Ar
10. नायट्रोजनचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Na
N
Ni
Ne
11. हीलियमचा वापर कुठे होतो?
फुग्यांमध्ये
खत बनविण्यासाठी
सिमेंट तयार करण्यात
औषधांमध्ये
12. अॅल्युमिनियमचे रासायनिक चिन्ह काय?
Au
Ag
Al
Ar
13. पोटॅशियमचे चिन्ह काय?
P
Po
K
Pt
14. सोडियमचे रासायनिक चिन्ह काय?
So
S
Na
N
15. गंधकाचे रासायनिक चिन्ह काय?
G
S
Si
Sr
16. हिलियम कोणत्या वायू समूहात मोडते?
नोबल गॅसेस
हॅलोजन
ऑक्सिजन समूह
धातू समूह
17. क्लोरीनचे रासायनिक चिन्ह काय?
Cr
C
Cl
Co
18. कॅल्शियमचा उपयोग कुठे होतो?
हाडे व दात मजबूत करण्यासाठी
इंधन म्हणून
औषध तयार करण्यात
फुग्यांमध्ये
19. निऑन वायूचा वापर कशासाठी होतो?
दिवे तयार करण्यासाठी
खत तयार करण्यासाठी
इंधनासाठी
औषध तयार करण्यासाठी
20. मॅग्नेशियमचे रासायनिक चिन्ह काय आहे?
Mn
Mg
Mo
Ma

रासायनिक नाव व रेणूसुत्रे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे आधारित टेस्ट

महत्त्वाची संयुगे, रासायनिक नाव, रेणुसूत्र आणि सामान्य नाव आधारित टेस्ट

1. पाण्याचे रासायनिक नाव काय आहे?
हायड्रोजन पेरॉक्साईड
कार्बन डायऑक्साइड
डायहायड्रोजन मोनोऑक्साईड ✅
नायट्रिक अॅसिड
2. मीठाचे रेणुसूत्र काय आहे?
NaCl ✅
KCl
CaCO₃
H₂SO₄
3. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे?
सोडियम कार्बोनेट
सोडियम बायकार्बोनेट ✅
अमोनियम क्लोराइड
कॅल्शियम ऑक्साईड
4. चुना (Quick Lime) चे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्साईड ✅
मॅग्नेशियम सल्फेट
सोडियम सल्फेट
पोटॅशियम नायट्रेट
5. पोटॅशियम नायट्रेट सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते?
मीठ
चुना
साल्टपीटर ✅
ब्लू व्हिट्रिऑल
6. सोडियम क्लोराइड म्हणजे काय?
सामान्य मीठ ✅
सोडा
चुना
बेकिंग सोडा
7. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग कुठे होतो?
सिमेंट तयार करण्यात ✅
खतामध्ये
रंग बनविण्यात
औषधांमध्ये
8. सल्फ्युरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र काय?
HCl
H₂SO₄ ✅
HNO₃
CH₃COOH
9. हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सामान्य नाव काय?
सॉल्ट अॅसिड ✅
अॅसिटिक अॅसिड
सल्फ्युरिक अॅसिड
नायट्रिक अॅसिड
10. नायट्रिक अॅसिडचे सूत्र काय?
H₂SO₄
HNO₃ ✅
HCl
CH₄
11. ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय?
कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड ✅
सोडियम हायपोक्लोराइट
पोटॅशियम क्लोराइड
अमोनियम सल्फेट
12. अॅसिटिक अॅसिड म्हणजे काय?
व्हिनेगर ✅
सोडा
मीठ
चुना
13. कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र काय?
CO₂ ✅
CO
H₂O
CH₄
14. ग्लुकोजचे सूत्र काय?
C₆H₁₂O₆ ✅
C₂H₅OH
CH₃COOH
CO₂
15. अमोनियाचे सूत्र काय?
NH₃ ✅
H₂O
CO₂
NO₂
16. कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट म्हणजे काय?
प्लास्टर ऑफ पॅरिस ✅
चुना
ब्लिचिंग पावडर
बेकिंग सोडा
17. नायट्रस ऑक्साईड कोणत्या नावाने ओळखले जाते?
लाफिंग गॅस ✅
कार्बन मोनोऑक्साईड
मिथेन
सल्फर डायऑक्साइड
18. सल्फर डायऑक्साइडचा उपयोग कुठे होतो?
खाद्य पदार्थ जतन करण्यासाठी ✅
खत बनविण्यात
औषध निर्मितीत
इंधन म्हणून
19. मिथेनचे सूत्र काय?
CH₄ ✅
C₂H₆
C₃H₈
CO₂
20. इथेनॉलचे सामान्य नाव काय आहे?
अल्कोहोल ✅
व्हिनेगर
सोडा
मीठ

शोध व संशोधक आधारित टेस्ट

शोध व संशोधक आधारित टेस्ट

🔬 शोध व संशोधक आधारित टेस्ट 🔭

1. दिव्याचा शोध कोणी लावला?




2. टेलिफोनचा शोध कोणी लावला?




3. संगणकाचे जनक कोण?




4. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?




5. स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला?




6. रेडिओचा शोध कोणी लावला?




7. क्ष-किरणांचा शोध कोणी लावला?




8. रेडियमचा शोध कोणी लावला?




9. वायूचे नियम कोणी सांगितले?




10. वीज निर्मितीचा शोध कोणी लावला?




11. विमानाचा शोध कोणी लावला?




12. थर्मामीटरचा शोध कोणी लावला?




13. प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला?




14. इंटरनेटचा शोध कोणत्या संस्थेने लावला?




15. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला?




16. बारूदाचा शोध कोणी लावला?




17. बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंटचा वापर कोणी केला?




18. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?




19. लसीचा शोध कोणी लावला?




20. दूरदर्शकाचा शोध कोणी लावला?




महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्...