मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

DRDO जेआरएफ पदांवर भरती2026

DRDO वॉक-इन मुलाखतीच्या माध्यमातून JRF पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल.



सायंटिफिक ग्रुप साठी देखील आहे. ज्या उमेदवारांकडे २ वर्षांचा अनुभव असेल, त्यांची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. चला, पात्रता आणि इतर तपशीलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


कोणत्या पात्रतेची गरज आहे?


गणित: प्रथम श्रेणी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नेट उत्तीर्ण.



संगणक विज्ञान : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech.


इलेक्ट्रॉनिक्स : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech पदवी.


भौतिकशास्त्र : प्रथम श्रेणी/पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आणि NET उत्तीर्ण.


वयोमर्यादा: वॉक-इन मुलाखतीच्या तारखेपर्यंत कमाल वय २८ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.


किती पगार मिळेल?


गणित पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी वॉक-इन मुलाखतीसाठी जाऊ शकतात. याशिवाय संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या जेआरएफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. लवकरच मुलाखतीच्या तारखेची घोषणा होऊ शकते.  पदावर दरमहा ३७,००० रुपये वेतन दिला जाईल. मुलाखतीच्या वेळी अर्ज तसेच पदवी आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.

मुलाखतीसाठी कुठे जावे लागेल?


मुलाखतीच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. तथापि, त्याचे आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. पात्र उमेदवारांना सकाळी ९ ते ११ या वेळेत मुलाखतीसाठी सांगितलेल्या पत्त्यावर जावे लागेल. मुलाखतीसाठी ‘मेन गेट रिसेप्शन,  हाऊस, दिल्ली-११००५४’ येथे जावे लागेल. लक्षात ठेवा की, मुलाखतीच्या वेळी सोबत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास परवानगी असणार नाही. तसेच, मुलाखतीला जाण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.


अशी करा अर्ज प्रक्रिया? अधिकृत वेबसाइटवर संबंधित अर्ज डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर भरलेला फॉर्म स्कॅन करून saghr.sag@gov.in या ईमेलवर पाठवा. लक्षात ठेवा की, या अर्जाची हार्ड कॉपी मुलाखतीच्या दिवशी सोबत घेऊन जावी लागेल.

ग्राम महसूल अधिकारी भरती 2026

 महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या तब्बल १ हजार ५३९ जागांचा नवीन समावेश करण्यात आला आहे.


नवीन पदांची भर पडल्यामुळे आता या गट-क परीक्षेंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांची संख्या थेट ५ हजार ७०७ वर पोहोचली आहे. या बदलामुळे अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला असून, आयोगाने उमेदवारांच्या हि लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील जाहीर केली आहे.




पदनाम व विभाग: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग)

नवीन समाविष्ट पदे: १५३९ जागा (एकूण गट-क पदे: ५७०७)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्राह्य धरली जाईल.

अधिकृत अर्ज लिंक: https://mpsconline.gov.in/candidate/login

Bank of India bharti

 पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह (SC, ST, OBC आणि PWBD उमेदवारांसाठी 55% गुण) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय CA, CMA-ICWA, CS किंवा CFA अशी व्यावसायिक पात्रता असणारे उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असणेही गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या ग्रेडनुसार 64,820 ते 1,20,940 रुपयांच्या दरम्यान आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांनी बँकेच्या 

 या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.





अर्जासाठी लागणारे शुल्क प्रवर्गानुसार निश्चित केले असून, General आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये (अर्ज शुल्क + इतर खर्च) शुल्क आकारले जाईल. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये (इंटिमेशन चार्जेस) शुल्क असणार आहे. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वीच आपला अर्ज आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती...

 


रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या मध्य विभागातील सातारा व सोलापूर जिल्यातील पूर्व प्राथमिक मराठी माध्यम (शिशु, लहान गट, मोठा गट) तसेच अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील रिक्त पदांवर शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार केवळ तात्पुरत्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन (Walk in Interview) खालील ठिकाणी रविवार दिनांक १४/०६/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या कालावधीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार खालील अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीचे ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे...


 

SET exam 2026

 



सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी '४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा' २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ जून २०२६ पासून सुरू होणार असून, नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२६ पर्यंत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.

अधिकृत वेबसाईट...

असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 पदांची भरती...

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2026 आहे.



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026


पदाचे नाव - असिस्टंट प्रोफेसर

पदसंख्या - 133 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण -पुणे

अर्ज शुल्क -

खुल्या वर्गासाठी -Rs. 1,000/-

आरक्षित प्रवर्ग (SC / ST / DT-A / NT-B / NT-C / NT-D / SBC / OBC / SEBC / EWS / PwBD) -Rs. 500/-

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 जून 2026

अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Sbi aprantis Bharti 2026

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशभरात एकूण 7000 पेक्षा जास्त अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. या पदभरतीसाठी जास्ती जास्त तरुणींना अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 19 मे रोजीपासून सुरू झाली आहे

.येत्या 8 जून रोजीपर्यंत अर्ज करता येणार नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. एसबीआयच्या अधिकृत पोर्टलवर हा अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा पास व्हावे लागणार आहे.

सोबतच परीक्षेत स्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठीही परीक्षा द्यावी लागेल. उमेदवाराल स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि समजली पाहिजे. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचा उमेदवार या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.

खुला प्रवर्ग, ओबीसी, ईडबल्यूएस या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी 300 रुपये फी लागेल. तर एससी, एसटी, PwBD प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. ऑनलाईन परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील.




रेल्वे नोकरी 2026

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) टेक्निकल भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यासाठी 6 हजारांपेक्षा अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे


मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्रेड-1 साठी 352 तर ग्रेड-2 साठी 6242 पदांची भरती होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 29 जुलै 2026 ही अंतिम मुदत असेल. म्हणजेच इच्छकांना अर्जासाठी तब्बल 1 महीना मुदत मिळमार आहे.


या भरतीमध्ये ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ग्रेड 1 पदांसाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे फिजिक्स , कॉम्प्युटर किंवा आयटीमध्ये पदव्युत्तर (ग्रॅज्युएशन) पदवी असणे आवश्यक आहे. तर ग्रेड 2 पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.


झोनवाईज रिक्त पदांची संख्या


सेंट्रल रेल्वे, मुंबई - 870


साउदर्न रेल्वे, चेन्नई - 785


नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी - 701


साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 576


नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली - 548


वेस्टर्न रेल्वे, मुंबई - 544


साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद - 368


ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 291


नॉर्थ सेंट्रल रेल्वे - 268


साउथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी - 240


वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर - 231


नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूर - 199


ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर - 186


नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर - 169


साउथ ईस्ट रेल्वे, बिलासपूर - 90


प्रोडक्शन युनिट (BLW/CLW/ICF) - 499


अर्ज शुल्क किती ?


रेल्वे टेक्निशियन पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्ग, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये असेल. तर SC/ST उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये आणि सर्व महिला उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये इतकी फी असेल.


अर्जामध्ये काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी 250 रुपयांचे अतिरिक्तशुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.


या रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात, अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


कशी असेल सिलेक्शन प्रोसेस ?


रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात सांगायचं झालं तर अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार केली जाईल.

विठ्ठल सखाराम पागे


       

           

          *विठ्ठल सखाराम पागे*                                                                  (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)                        

          

     *जन्म : 21 जुलै 1910*

    (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)

      *मृत्यू : 16 मार्च 1990*

 शिक्षण : B.A.LLB                                                   ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा १६ मार्च हा २० वा स्मृतिदिन. श्री. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.


वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्टय़ होते. अठरा वर्षे विधान परिषदेचे सभापतिपद सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोडय़ा लोकांना जमू शकते. विशेषत: वै. पागे यांच्या कारकीर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाटय़ात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते. अशावेळी कै. पागे अतिशय शांतपणे, कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत, की तो आपोआपच सर्वाना मान्य ठरत असे. परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीपेक्षाही त्यांची आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हणूनच.

‘रोजगार हमी योजनेचा’ कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे. तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे कै. पागे यांनी केली. एखाद्या राज्याच्या विकासकार्यात इतक्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोटय़वधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली आहे. या योजनेमुळे शहरांकडे जाणाऱ्या लोंढय़ांचे स्थलांतराचे प्रमाण नि:संशयपणे कमी झाले आहे. १९६९ साली कै. श्री. पागे यांच्या सांगली जिल्ह्य़ातील विसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबविण्यात आली.

सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला आहे. काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटविण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे कै. श्री. पागे हे अभ्यासू चिंतक होते. विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधान परिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचविले होते.

अध्यात्म, संतवाङमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर बोलताना वि. स. पागे रंगून जात असत. त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण या विषयांचा गाढ अभ्यासही जाणवत असे. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून सतत जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता.

कै. वि. स. पागे हे उत्तम दर्जाचे कवी. नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचे नाटक लिहिले होते. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली होती. त्याचप्रमाणे ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक कै. श्री. दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे.

खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या कै. वि. स. पागे यांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या, अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा.

                                                                                                                                  

          

MpSC भरती जाहिरात.2020

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची बहूप्रतीक्षित जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक अश तीन पदांचा समावेश आहे. 

एकूण ५५२ जागांचा समावेश असून यासाठी महाराष्ट्राती ३७ परीक्षा केंद्रावर रविवार १४ जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे 




DRDO जेआरएफ पदांवर भरती2026

DRDO वॉक-इन मुलाखतीच्या माध्यमातून JRF पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आय...