मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत.महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदे २५८ असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ डिसेंबर आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचा-यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब या पदांवर निवडीद्वारे नियुक्तीकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र, परीक्षेचे स्वरुप (Online/Offline) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

२. संवर्गाचे नाव :- महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), गट-ब

३. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी – विषयांकित संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईल पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी खालीलप्रमाणे राहील :-

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तर १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी १४ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदत आहे.

भारतीय संविधान दिन..



       *26 नोव्हेंबर - संविधान दिन*


            घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९ (फोटो पहा)


भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.


📜 *इतिहास*

        भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्या पैंकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्या पैंकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जाने, इ.स. १९४७)

 

      १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर  १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.

              २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर  १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.


📖 *स्वरूप*

      भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ३९५ (डिसेंम्बर २०१८) कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारताची घटना हि अतिशय लवचिक असून जगातील इत्तर घटनेपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकाच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.


📒 *तोंडओळख व महत्त्वाची अंगे*

           भारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४ व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवस्थे प्रमाणे भारतीय संसदही द्विगृही (Bicameral) आहे.


📖 *उद्देशिका*

                 भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -


सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय

आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य

आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते.

मूळ उद्देशिकेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.


🗳 *मूलभूत अधिकार*

                 भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे जसे - कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांधारे न केला जाणारा भेदभाव (कलमे १२ -१८) दलितांवरच्या अत्याचारा विरुद्धचे कलम १७ विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणे हा या कलमाने दंडनीय गुन्हा आहे. घटनेत पाच मूलभूत प्रकारचे अधिकार ओळखण्यात आले आहेत.


स्वातंत्र्य (कलम १९-२२): भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य (कलम १९)

कायदा (कलम २०), जीविताचा अधिकार (कलम २१), काही बाबींमध्ये अटक वा कैदेचे स्वातंत्र्य (कलम २२)

शोषणाविरूद्ध संरक्षण (कलम २३ व २४): बालमजूरी व मानवी तस्करी (human trafficking) पासून सं‍रक्षण

धर्मस्वातंत्र्य (कलम २५-२८) : पूजा व आचरणाचे स्वातंत्र्य

अल्पसंख्याकांचे अधिकार (कलम २९ व ३०): अल्पसंख्याकांना संरक्षण व स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापण्याचे स्वातंत्र्य

घटनात्मक तक्रारींचा अधिकार (कलम ३२-३५): मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.

मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारे कलम ३१ हे १९७८ साली वगळण्यात आले होते. ही वगळण वादग्रस्त ठरली होती.


📘 *सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे*

     राज्यघटनेच्या चौथ्या विभागात राज्य व संघ स्तरावरील सरकारे तसेच संसदे/विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी. कलम ४३ अन्वये समाविष्ट आहेत. कलम ४५ अन्वये १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचे दायित्व आहे. कलम ४६ अन्वये समाजातील मागास घटकांच्या (विशेषतः आदिवासी व दलित घटकांना) उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय चौथ्या विभागात न्यायालयीन (Judiciary) व प्रशासकीय (Executive) अधिकारांचा कलम ५० मध्ये व पंचायत स्थापण्याचा कलम ४०) मध्ये उल्लेख आहे.


निसर्गरक्षण (कलम ४८-अ), स्मारकांचे जतन (कलम ४९), आंतरराष्ट्रीय शांतता व परस्पर मैत्री संबंधांविषयीचे कलम (कलम ५१) आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ (Vague) असे आहे. वरील पैकी कोणतीही कलमे सरकारसाठी सक्तीची नाहीत. किंबहुना तात्विक मूल्ये (Moral values) असेच त्याचे स्वरूप आहे.


📙 *सत्ता*

सत्तेचे भारतात तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे -

कार्यकारी (Executive)

कायदेकारी(Legislative)

न्यायालयीन (Judicial)

प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या मर्यादा सुस्पष्टपणे आखून देण्यात आल्या आहेत. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र सर्वोच्च न्यायालय असते.


भारतातील संसद ही द्विगृही (Bicameral) आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधिमंडळे एकगृही(Unicameral) वा द्विगृही(Bicameral) असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे खालील सभागृह (Lower House) तर विधानपरिषद हे वरील सभागृह(Upper House) असते.


📔 *संघराज्य प्रणाली*

                        भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगे अशा कारणांमुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज घटनाकारांस भासली. राज्ये संघराज्यापासून फुटू नयेत यासाठी केंद्रीय सरकारकडे जादा अधिकार देण्यात आले आहेत. गाव व तालुकास्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णतः स्वायत्तता देण्यास याच कारणास्तव उशीर झाला.


📗 *अधिकृत भाषा*

         संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असावी हा घटनासमितीतील सर्वाधिक वादाचा मुद्दा होता, असे डॉ.आंबेंडकरांनी आपल्या आठवणीत नमूद केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. यासोबत इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी करण्यात येईल. हिंदी भाषेस घटनेने राष्ट्रभाषा नव्हे तर संघराज्याची अधिकृत भाषा असा दर्जा दिलेला आहे. या सोबत इतर २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. इंग्रजी भाषेच्या वापराविषयी दर १५ वर्षात पुनरावलोकन करावे अशी तरतूद घटनेत आहे.

                      कलम ३४५ अन्वये राज्यांना हिंदी वा एकाधिक प्रादेशिक भाषा वापरण्याचा पर्याय आहे. कलम ३४६ अन्वये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे परस्परांशी व राज्यांचे परस्परांशी दळणवळण हिंदी वा इंग्रजीत असावे अशी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. राष्ट्रपतीच्या अनुमतीने उच्च न्यायालयात हिंदी वा इतर प्रादेशिक भाषांच्या वापरास मुभा आहे. जर हिंदी व इंग्रजी भाषेतील कोणत्याही कायदेशीर दस्तात मतभेद/फरक दिसल्यास इंग्रजी भाषिक मजकूर ग्राह्य मानला जाईल असे कलम ३४८ सांगते


📙 *आणीबाणीविषयक तरतुदी*

भारताच्या राज्यघटनेत आणीबाणी विषयकच्या अनेक तरतुदींचा उल्लेख आहे. आणीबाणीचे तीन प्रकार सांगितले आहेत. यात -


राष्ट्रीय आणीबाणी - जेव्हा राष्ट्र वा त्याचा मोठा हिस्सा आपदकालीन स्थितीत असतो तेव्हा

प्रादेशिक आणीबाणी - जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा

आर्थिक आणीबाणी - जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य वा पत धोक्यात असते तेव्हा

अशा तीन आणीबाणींचा समावेश आहे

                राज्यघटनेच्या ३५२व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकता. ३५३ व्या कलमानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत सारे अधिकार संसदेकडे एकटवितात. राज्यघटनेच्या ३५९व्या कलमानुसार राष्ट्रपती विभाग ३द्वारे नागरिकांस दिलेल्या सर्व मूलभूत अधिकारांचा प्रत्याहार (काढून घेणे) करू शकतो. ३५८व्या कलमानुसार कलम १९मधील नागरिकांचे अधिकार आणीबाणीच्या काळात आपोआप समाप्त होतात. म्हणजेच व्यवस्थेचे इतर काळी उदारमतवादी असलेले रूप या काळात अनुदार बनते. राज्यघटनेच्या ३५६व्या कलमानुसार राज्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास राज्याचा कारभार राष्ट्रपतींकडे देण्यात येतो. राज्याच्या विधिमंडळाचे काम या काळात संसद करते. या स्थितीस राष्ट्रपती राजवट असे म्हणतात.


📗 *कलमांचा गोषवारा*

संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -

कलम 1 संघाचे नाव आणि भूप्रदेश

कलम 2 - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती

कलम 2(अ)-सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम 3- नवीन राज्याची स्थापना, सिमा किंवा नावे बदलणे

कलम 4-कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेले बदल, कलम368 अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही

भाग 2 - कलमे 5-11नागरिकत्व

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१

कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.

*भाग ५ -*

प्रकरण १ - कलमे ५२-७८

कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,

कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक

कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,

कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत

प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,

कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,

कलमे ९९-१००

कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,

कलमे १०७-१११ (law making process)

कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,

कलमे ११८-१२२

प्रकरण ३ - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत

प्रकरण ४ - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत

प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत

भाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून

प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,

कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,

कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.

कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.

प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती

कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार

कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी

कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत

कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे

कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी

कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी

कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी

प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.

प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


📓 *भाग ७ - राज्यांच्या बाबतीतील कलमे.*

कलम २३८ -

भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत

भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत

भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.

कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत

भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ

भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

प्रकरण २ - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य

कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.

कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.

भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य

कलमे २६८ - २८१

कलमे २८२ - २९१ इतर

प्रकरण २ - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३

प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००

प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -

भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५

कलम ३०६ -

कलम ३०७ -

भाग १४ -

प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३

कलम ३१४ -

प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम

भाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी

भाग १५ - निवडणूक विषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे

कलम ३२९ अ -

भाग १६ -

कलमे ३३० -३४२

भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमे

प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत

प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत

प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी

प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -

कलम ३५० अ -

कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम

कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलम

भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलम ३५९ अ -

कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय

कलम ३६२ -

कलमे ३६३ - ३६७ - इतर

भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती

भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ

कलमे ३७९ - ३९१ -

कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क

भाग २२ -

कलमे ३९३ -३९५


📝 *घटनादुरुस्त्या*

                राज्यघटनेच्या ३६८व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे. घटनादुरुस्तीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणे व २/३ बहुमताने मंजूर होणे बंधनकारक आहे. घटनेच्या काही कलमांमधील दुरुस्त्यांना संसदेशिवाय किमान निम्म्या राज्यांच्या संमतीची गरज असते. संसदेच्या मान्यतेनंतरषे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यावर ही दुरुस्ती अंमलात येते. 

 

हेमंत करकरे..

                                 


              *हेमंत करकरे*

   (मुख्याधिकारी - मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक)

             *जन्म : १२ जुलै १९५४*

                 (आमला, मध्यप्रदेश)

             *वीरगती : २६ नोव्हेंबर २००८*

                  (मुंबई)

मृत्यूचे कारण : २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

राष्ट्रीयत्व : भारतीय

वांशिकत्व : भारतीय

नागरिकत्व : भारतीय

शिक्षण : बी.ई.

पेशा : मुंबई पोलिस

कारकिर्दीचा काळ : १९८२ - २००८

प्रसिद्ध कामे : मालेगाव बाँबस्फोटाचा तपास

पदवी, हुद्दा : मुख्याधिकारी, दहशतवाद विरोध पथक

कार्यकाळ : जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २००८

पूर्ववर्ती : के. पी. रघुवंशी

धर्म : हिंदू

जोडीदार : कविता

वडील : कमलाकर

आई : कुमिदिनी

पुरस्कार : अशोक चक्र(२००९)

मुंबई पोलीस सेवेमधील अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व अशी ख्याती लाभलेले हेमंत कमलाकर करकरे ह्यांचा जन्म  मध्यप्रदेशातील आमला ह्या खेड्यात झाला. वडिलांची रेल्वेत नोकरी असल्यामुळे बदलीमुळे सतत शहरे, गावे बदलत राहावी लागायची,  त्यामुळे तीन भाऊ, एक बहीण आणि आईवडिलांसह करकरे यांचे बालपण आणि शालेय, महाविद्यालयीन शिक्षण विविध शहरांत पूर्ण झाले. मध्यप्रदेशातून पुढे वर्धा येथील वास्तव्यात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण नागपुरात न्यू इंग्लिश हायस्कुलामध्ये घेतले. नागपुरातच सर विश्वेश्वरय्यांच्या महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. शाळेत त्यांचा नेहमी पहिलाच क्रमांक असायचा.


     करकरे यांच्या मातोश्रीदेखील बी.ए., एम.ए., एम.एड. अशा उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या हेमंत करकरे यांनी ‘पहिलीचा सगळा अभ्यास पाठ येतो’ म्हणून बदलीच्या ठिकाणच्या वर्धा येथील शाळेच्या पहिलीच्या वर्गात बसण्यास नकार दिला आणि दुसरीत बसण्याचा हट्ट धरला. मुळातच तल्लख बुद्धीच्या हेमंत करकरे ह्यांनी अभियांत्रिकीनंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्या अभ्यासक्रमातून त्यांना पीएच.डी. नंतर परदेशी जाण्याची आणि सुबत्तेची करिअर करण्याची संधी चालून आली. परंतु, करिअर करायचे ते देशसेवेतील आस्थापनेतच, हाच करकरे यांचा विचार व ध्यास त्यांना मिळालेल्या संस्कारातून ठाम झाला होता. त्यामुळे काही वर्षे इंटरनॅशनल ट्रॅक्टर येथे नोकरी केल्यानंतर ते स्पर्धा-परीक्षांकडे वळले. भारतीय परराष्ट्र सेवेच्या प्रवेश चाचण्यांमध्ये महाराष्ट्रातून ते सुवर्णपदक विजेते ठरले. तो ही मार्ग नाकारून, पुन्हा भारतीय पोलीस सेवेसाठी अभ्यास करून ते ‘आय.पी.एस.’ ह्या आपल्या आवडीच्या करिअरकडे झेपावले.


      १९८२ ची ती आयपीएसची बॅच, आयपीएस होण्याआधी शिक्षणाच्या निमित्ताने, तसेच अन्य ठिकाणी नोकरी करताकरताच त्यांना जंगलविषयक, कोळसा खाणी, पर्यावरण, लोकजीवन ह्यांचे जवळून अवलोकन करण्याची संधी मिळाली. ह्या सार्‍या अनुभवांचा उपयोग त्यांना पोलीस सेवेत करता आला. मानसशास्त्र उत्तमप्रकारे जाणणार्‍या करकरे ह्यांनी अमली पदार्थविरोधी खात्यात, तसेच आर्थिक गुन्हे शाखांमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे गुन्हेगार आणि कार्यालयीन यंत्रणेतही आपला दबदबा निर्माण केला होता. शासनाला अशा गुन्ह्यांसंबंधीचे प्रभावी अहवालही सादर केले होते. हेमंत करकरे यांनी आपल्या सव्वीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अतिशय संवेदनशील खात्यांत आणि तितक्याच धाडसी उपक्रमांत आपले योगदान दिले.


      एरवी चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करण्यास कुणीही शासकीय अधिकारी, कर्मचारी नाखूष असतो; परंतु त्यांनी तेही आव्हान आनंदाने स्वीकारले. आपल्या उगवत्या संसाराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक ह्या भूमिकेत काम करताना त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात केले. प्रसंगी नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले. तेथील यशस्वी कालखंडानंतर त्यांना ‘रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग’ म्हणजे ‘रॉ’मध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. तेथे ते पाच वर्षे होते.


     ‘रॉ’मधून त्यांना मुंबई सह पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली. हा मुंबई पोलीस विभागाचा प्रशासन विभाग होता. ह्या विभागात सह पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रलंबित कामे मार्गावर आणून पूर्ण केली. समाजाभिमुख पोलीस अधिकारी अशी प्रतिमा तयार करून त्यांनी पोलीस यंत्रणेचीच एक वेगळी ओळख समाजमनात रुजवली. अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा एरवी वंचित असणार्‍या वर्गासाठी त्यांनी अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपल्याच खात्यातील सर्वसामान्य पोलिसांच्या अडचणी, हितांबाबत ते नेहमी विचार करीत आणि  त्यांच्या आश्वासक भवितव्यासाठी प्रयत्नशील असत.


      करकरे हे एक ‘हटके’ ह्या प्रकारचे पोलीस अधिकारी होते, असे म्हणायला हरकत नाही. कारण पोलीस वर्दीतील ह्या करड्या शिस्तीच्या अधिकार्‍याच्या आत एक रसिक आणि व्यासंगी वाचक, भाष्यकार दडला होता. त्यामुळेच घरच्याप्रमाणे आपल्या कार्यालयाच्या कपाटातही कार्यालयीन कामाच्या संदर्भातील पुस्तके, ग्रंथांप्रमाणेच अन्य वाङ्मयीन विषयांवरील पुस्तकांचे वाचनालयही खुले असायचे. इंग्रजी, मराठी, हिंदी ह्या भाषांतील साहित्यकृतींबरोबरच अन्य भारतीय साहित्यांतही त्यांना विशेष रुची होती. टागोर, खलिल जिब्रान, प्रेमचंद, रसेल, शरच्चंद्र, शेक्सपिअर अशा अनेक दिग्गजांच्या साहित्यकृतींवर ते समर्थपणे बोलत असत; सामाजिक विषयांवर व्याख्यानेही ते आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून देत असत.


      २००८मध्ये त्यांनी दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुखपद स्वीकारले. ह्याच काळात मालेगाव बाँबस्फोट हे गाजलेेले प्रकरण त्यांनी हाताळले. ह्या प्रकरणानंतर ते ‘एटीएस प्रमुख’ म्हणून अधिकच प्रकाशमान झाले. त्यानंतर सात-आठ महिन्यांनंतरच पाकिस्तानी अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना त्यांना कामा इस्पितळ, मुंबई येथे हौतात्म्य प्राप्त झाले. कुलाबा, सीएसटी, कामा इस्पितळ परिसरात २६ नोव्हेंबर २००८ च्या सायंकाळी, सीएसटी येथील परिसरात अतिरेकी घुसल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आखणी केली आणि ते अतिरेक्यांच्या मागावर निघाले. परंतु, अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत ह्या शूर, अभ्यासू आणि सुसंस्कृत पोलीस अधिकार्‍याला आपल्या प्राणास मुकावे लागले. भारत सरकारने हेमंत करकरे ह्यांना ‘अशोकचक्र’ हा पुरस्कार दिला. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कविता करकरे ह्यांनी तो स्वीकारला.

                   - 

विजय साळसकर. ..

 

           🎖️ *अशोक चक्र* 🎖️

 

            *विजय साळसकर*

(ज्येष्ठ पोलीस अधिकारी व सामना विशेषज्ञ)

             *वीरगती : २६ नोव्हेंबर २००८*

               (मुंबई, महाराष्ट्र, )भारत

मृत्यूचे कारण : दहशतवादी हल्ला

राष्ट्रीयत्व : भारतीय

वांशिकत्व : भारतीय

नागरिकत्व : भारतीय

शिक्षण : एम. कॉम.

प्रशिक्षणसंस्था : मुंबई विद्यापीठ

पेशा : पोलिससेवा

कार्यकाळ : १९८३ - २००८

धर्म : हिंदू

जोडीदार : स्मिता साळसकर

आई : हेमंता साळसकर

पुरस्कार : अशोक चक्र(२००९)

              विजय साळस्कर हे मुंबई पोलिसांमध्ये काम करणारे ज्येष्ठ पोलीस अधिकारी व सामना विशेषज्ञ होते. त्यांना ७५-८० गुन्हेगारांना - जे जास्त करून अरुण गवळी टोळीतील होते यांना मारण्यासाठी विशेष श्रेय दिले जाते.

               मुंबईत झालेला २६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही. या दिवशी अतिरेक्यांना संपूर्ण मुंबई हादरली होती. पण या सगळ्यांमध्ये धाडसी कामगिरी बजावली ती आपल्या मुंबई पोलिसांनी. विजय साळसकर हे या तीन धाडसी अधिकाऱ्यांपैकी एक होते, ज्यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि अशोक कामटे हे कारमध्ये बसले होते. ड्रायव्हिंग सीटचे कमांड असलेले अधिकारी विजय साळसकर होते. ते कामा हॉस्पिटलच्या बाहेर दहशतवाद्यांशी लढताना मरण पावले. झाडामागे लपलेल्या दहशतवाद्यांनी अधिकाऱ्यांच्या गाडीवर गोळीबार केला आणि तिन्ही अधिकारी देशासाठी शहीद झाले.


*शौर्यासाठी २००९ मध्ये मिळवलं अशोक चक्र...*


विजय साळसकर हे २००८ मध्ये शहीद झाले होते. पण २००९ मध्ये त्यांच्या शौर्याासाठी आणि देशावरील प्रेमासाठी त्यांना अशोक चक्र मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला होता. मुंबईत झालेल्या हल्ल्यावेळी साळसकरांच्या शौर्याची कहाणी वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. परंतु, या आधीही मुंबईतील या शूर अधिकाऱ्याच्या कहाण्या तुमच्या अंगावर शहारे आणतील. 


*चकमकीत ८० गुन्हेगारांचा खात्मा....*


देशातील टॉप १० एन्काऊंटर स्पेशलिस्टपैकी एक नाव आहे विजय साळसकर यांचे. १९८३ मध्ये मुंबई पोलिसात ते रुजू झाले. उपनिरीक्षक पदावर त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट पथकाचा ते भाग बनले. मुंबई पोलिसांमध्ये रुजू झाल्यानंतर वर्षभरातच त्यांना मुंबईतील गुन्हेगार राजा सहाबुद्दीनशी सामना झाला आणि त्यानंतरच ते प्रसिद्ध झाले. विजय साळसकर यांच्या नावावर तब्बल ७५ ते ८० गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबई गुन्हेगार मुक्त करण्यामध्ये विजय साळसकर यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. त्यांच्या काळामध्ये मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या सर्वात विश्वास अधिकाऱ्यांपैकी एक होते विजय साळसकर.


*अरुण गवळीच्या टोळीचा खात्मा...*


८०च्या दशकामध्ये मुंबईत अंडरवर्ल्डचा धाक होता आणि त्या धाकाचा खात्मा केला विजय चाळसकर यांनी. साळसकर यांनी धाडसी अधिकाऱ्यांच्या मदतीने डॉनच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला. विजय साळसकर यांनी अरुण गवळी टोळीतील अनेक शूटरला ठार मारलं तर अनेकांना अटक केली. मुंबईतील आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार, एकदा अरुण गवळी यांनी महिला पत्रकाराला मारहाण केली होती. त्यावेळी साळसकर यांनी अरुण गवळीला घरातून उचलून जेलमध्ये टाकत पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचेही बोललं जातं.


अनेक चकमकीत त्यांनी बडे शूटर मारले आहेत. १९९७ मध्ये साळसकर यांनी अवघ्या १५ दिवसांमध्ये अरुण गवळीचे प्रमुख नेमबाज गणेश शंकर भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल यांना चकमकीमध्ये ठार केलं. यानंतर साळसकर यांनी नेमबाज दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बांदेकर, बबन राघव आणि बंड्या आडिवडेकर यांनाही ठार केलं. अरुण गवळीनंतर आमदार झाल्यावरही या धाडसी पोलिसांनी या टोळीचा खात्मा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.


*विजय साळसकर यांच्यावरही अनेक आरोप...*


मुंबई पोलिसांमध्ये महाराज म्हणून प्रसिद्ध झालेल्या विजय साळसकर यांना २५ वर्षांच्या पोलीस सेवेमध्ये अनेक आरोपांना सामोरे जावे लागलं. एका चकमकीमध्ये १८ वर्षांचा मुलगा मारला गेला यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. इतकंच नाहीतर गुटखा व्यापाऱ्यांशी त्यांचं संगमत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामुळे त्यांची सर्विस पिस्तूलही काढून घेण्यात आली होती.


विजय साळसकर नंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी सेलचा एक भाग झाले. पणशूर अधिकारी आता फक्त आठवणींमध्ये राहिले आहेत. विजय साळस्कर यांचे संपूर्ण कुटुंब आजही मुंबईच्या हल्ल्याची ती रात्र विसरू शकत नाहीत. आजही त्या रात्रीबद्दल आठवलं तर ते भावूक होतात, जेव्हा विजय हौतात्म्याची बातमी त्यांना फोनवरून मिळाली. साळसकर यांच्या पत्नी स्मिता यांनी त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांपर्यंत कोणताही सण साजरा केला नाही. मुंबई हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यानंतरच त्यांनी पहिल्यांदा घरी गणपतीचे आगमन केलं.


*कसाबला फाशी मिळाल्यानंतर घरात सण साजरा केला...*


पत्नी स्मिता यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, साळसकर दरवर्षी घरी गणपती आणत असतात. याशिवाय दिवाळीही घरी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. परंतु, असं असतानाही ४ वर्षांपासून त्या सणांपासून दूर राहिल्या. विजय साळसकर यांची मुलगी सांगते की, जेव्हा तिला तिच्या वडिलांची आठवण येते, तेव्हा ती त्यांचे व्हिडिओ युट्युबवर पाहते. विजय साळसकर यांनी गुन्हेगारांना शिक्षा देण्यात कधीही विचार केला नाही. त्यांच्या या शौर्यालाही मुंबई आणि अवघा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

         

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26

 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26 साठी नावनोंदणी करण्याकरिता अंतिम मुदतवाढ*        

====================                                                                                                                                         

        राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा   सन 2025-26  मध्ये राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षक व अधिकारी यांनी हाती घेण्यात आलेले नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर करण्यात यावेत. सोबतच्या लिंकवर देण्यात आलेले माहित्रीपत्रक अवलोकन करून स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात यावेत. 


*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात आलेली आहे.* 

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका 

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक 

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती

५. अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व  अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)

 नवोपक्रम सादर करण्यासाठी लिंक देण्यात येत आहे. 


*नवोपक्रम नोंदणी लिंक:*

 https://forms.gle/N1KnzaQjP4VsPn2v5 


दिलेल्या लिंकवर आपले नवोपक्रम सादर करण्यासाठी *दि.30/11/2025* पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. दिलेल्या कालावधीत आपले नवोपक्रम सादर करण्यात यावेत. यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही.

                                                 

  

भारतरत्न इंदिरा गांधी

 

        *भारतरत्न इंदिरा गांधी*

  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)

     *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*

            (मुघलसराई)

   *मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४*

        ( नवी दिल्ली, भारत)

          *कार्यकाळ*

जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४


              *राष्ट्रपती*

नीलम संजीव रेड्डी

झैल सिंग

मागील : चौधरी चरण सिंग

पुढील : राजीव गांधी


               *कार्यकाळ*

जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७


                *राष्ट्रपती*

सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : मोरारजी देसाई


*भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

मागील : पी.व्ही. नरसिंहराव

पुढील : राजीव गांधी


            *कार्यकाळ*

ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९

मागील : एम.सी. छगला

पुढील : दिनेश सिंह


*भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ*

जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१

मागील : मोरारजी देसाई

पुढील : यशवंतराव चव्हाण


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      कांग्रेस

पती : फिरोज गांधी

अपत्ये : राजीव गांधी आणि 

             संजय गांधी

निवास : १, सफदरजंग रोड, 

              नवी दिल्ली

धर्म : हिंदू

चिरविश्रांती : शक्तीस्थळ


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.


लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.


इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.


१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.


💁🏻‍♀️ *बालपण*

           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.

 

👫 *फिरोज गांधींसोबत विवाह*

             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.


💠 *राजकारणातला प्रवास*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद*

           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.


📺 *माहिती व नभोवाणी मंत्री*

                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.


पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.


👩‍🦰 *पंतप्रधान* ⚜️

                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.


जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.


💣 *१९७१ चे भारत पाक युद्घ*

                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.


📝 *इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक*

इंदर मल्होत्रा

उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)

कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

डॉम मोराईस (मिसेस गांधी)

पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)

पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)

प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)

सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

 

📕 *इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके*

               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)

दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)


🔲 *टपालाचे तिकीट*

                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

                      

         

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे..


  *श्रीमंत थोरले माधवराव पेशवे*


     *जन्म : १६ फेब्रुवारी १७४५*

     *मृत्यू : १८ नोव्हेंबर १७७२*

       (थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र)


*अधिकारकाळ*

      जुलै २७, १७६१ - 

                    नोव्हेंबर १८, १७७२


अधिकारारोहण : जुलै २७, १७६१

राजधानी : पुणे

पूर्ण नाव : माधवराव बाळाजी भट 

                      (पेशवे)

पूर्वाधिकारी : नानासाहेब पेशवे

उत्तराधिकारी : नारायणराव पेशवे

वडील : नानासाहेब पेशवे

आई : गोपिकाबाई

पत्नी : रमाबाई

       श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.


बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.


🤺 *शत्रूचा उठाव*

               पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.

निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.

या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.

इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.


🚩 *दिल्लीकडील राजकारण*

                पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्य कारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.

मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.

या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.


🌀 *त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी*

                       इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.


🪔 *माधवरावांचा मृत्यू*

                        इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यात त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.


📚 *माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील पुस्तके*

माधवराव पेशवा (बालसाहित्य, लेखक मदन पाटील)

रमा माधव (ऐतिहासिक चित्रपट. दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी)

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे)

स्वामी (कादंबरी, रणजित देसाई)

  

       

आचार्य विनोबा भावे..

 

          

           *आचार्य विनोबा भावे*

(अहिंसा आणि मानवाधिकाराचे भारतीय पुरस्कर्ता, भूदान चळवळीचे प्रवर्तक)


पुर्ण नाव : विनायक नरहरी भावे

        *जन्म : ११ सप्टेंबर १८९५*

         (गागोदे, पेण , जि. रायगड)

        *मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२*                           (लक्ष्मीपूजन -दिवाळी)

        (पवनार, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा,

भूदान चळवळ

पुरस्कार : भारतरत्न पुरस्कार (१९८३)

धर्म : हिंदू

प्रभाव : महात्मा गांधी

वडील : नरहर शंभूराव भावे

आई : रखुमाबाई नरहर भावे

                विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध)  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

💁🏻‍♂️ *सुरुवातीचे जीवन*

(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.


*जीवन कार्य*

🇮🇳 *स्वातंत्र्य लढा*

                     महात्मा गांधींसोबत

ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.


🔮 *सामाजिक व धार्मिक कार्य*

            वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्रबुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे. दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत. १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगती केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !".


                    विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला.


१९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबंध आयुष्य -१९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या ८ किमी. परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महत्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.


१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.


या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली. लो. टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानला नाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टिकोन मान्य केला, असे दिसून येते. मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टिकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. महात्मा गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृदयात चाललेल्या सद्‍भावना व असद्‍भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत; असे महत्मा गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्‍गीता वाचत असताना विनोबा भगवद्‍गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि महत्मा. गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही. म्हणूनच, गीता जरी सशस्त्र हिंसात्मक युद्धाचा पुरस्कार करत असली, तरी गांधींना आणि विनोबांना या गीतेने कायम मोहून टाकले आहे. म्हणून गांधींनी आणि विनोबांनी जन्मभर सकाळ-संध्याकाळ चालविलेल्या प्रार्थनासंगीतात भगवद्‍गीता ही कायमची अंतर्भूत केली होती.


वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.


दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्‍ज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"


🏛️ *विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा*

                 आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युतवेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरुषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे. जैन धर्मात या तंत्रास 'सल्लेखना' अशी संस्कृत संज्ञा आणि 'संथारा' ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास 'प्रायोपवेशन' म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे. ज्ञानदेवादी संतांनी योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी यांनी अशाच प्रकारे देहत्याग केला आहे.


⛲ *विनोबांचे विचार*

१) वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते. २) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे . [१] ३) आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार . ४) हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता. ५) प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा. ६) असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी हि त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. ७) सत्य , संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. ८) ईश्वर, गुरु ,आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने . ९) इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत चे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश.


🗽 *विनोबांचे स्मारक*

          विनोबांसह नरहर कुरुंदकर, वसंतदादा पटील, बालगंधर्व, जी.डी. बापू लाड, नागनाथ‍अण्णा नायकवाडी, बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्‍नागिरी), चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार, आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.


📙✍️ *पुस्तके*

अष्टादशी (सार्थ)

ईशावास्यवृत्ति

उपनिषदांचा अभ्यास

गीताई

गीताई-चिंतनिका

गीता प्रवचने

गुरुबोध सार (सार्थ)

जीवनदृष्टी

भागवत धर्म-सार

मधुकर

मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)

लोकनीती

विचार पोथी

साम्यसूत्र वृत्ति

साम्यसूत्रे

स्थितप्रज्ञ-दर्शन

📚 *चरित्रग्रंथ*

आमचे विनोबा (राम शेवाळकर आणि इतर)

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)

दर्शन विनोबांचे (राम शेवाळकर)

ब्रह्मर्षी विनोबा (बालसाहित्य, लेखक - विठ्ठल लांजेवार)

महर्षी विनोवा (राम शेवाळकर)

महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)

विनोबांचे धर्मसंकीर्तन (राम शेवाळकर आणि इतर))

विनोबासारस्वत (राम शेवाळकर आणि इतर)

साम्ययोगी विनोबा (राम शेवाळकर)

         



Sentences for Kids' Good Habits.

 51. Help your friends when they need. (हेल्प युवर फ्रेंड्स व्हेन दे नीड)

✦ मित्रांना गरज असेल तेव्हा मदत करा.

52. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)

✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

53. Help your classmates in studies. (हेल्प युवर क्लासमेट्स इन स्टडीज)

✦ वर्गमित्रांना अभ्यासात मदत करा.

54. Give food to hungry people. (गिव फूड टू हंग्री पीपल)

✦ भुकेल्यांना अन्न द्या.

55. Don’t hurt anyone’s feelings. (डोन्ट हर्ट एनीवन्स फीलिंग्स)

✦ कुणाच्याही भावना दुखावू नका.

56. Share your knowledge with others. (शेअर युवर नॉलेज विथ ऑदर्स)

✦ तुमची माहिती इतरांसोबत शेअर करा.

57. Encourage others when they are sad. (एनकरेज ऑदर्स व्हेन दे आर सॅड)

✦ जे उदास आहेत त्यांना प्रोत्साहित करा.

58. Help clean the classroom. (हेल्प क्लीन द क्लासरूम)

✦ वर्ग स्वच्छ करण्यात मदत करा.

59. Stand up for someone in need. (स्टँड अप फॉर समवन इन नीड)

✦ गरज असलेल्या व्यक्तीसाठी उभे रहा.

60. Share your umbrella in rain. (शेअर युवर अंब्रेला इन रेन)

✦ पावसात तुमचा छत्री शेअर करा.

🌱 Environmental Habits (पर्यावरणासाठी चांगल्या सवयी)

61. Don’t litter anywhere. (डोन्ट लिटर एनीव्हेअर)

✦ कुठेही कचरा फेकू नका.

62. Plant more trees. (प्लांट मोअर ट्रीज)

✦ अधिक झाडे लावा.

63. Save water. (सेव वॉटर)

✦ पाणी वाचवा.

64. Save electricity. (सेव इलेक्ट्रिसिटी)

✦ विजेची बचत करा.

65. Don’t waste paper. (डोन्ट वेस्ट पेपर)

✦ कागद वाया घालवू नका.

66. Recycle waste materials. (रिसायकल वेस्ट मटेरियल्स)

✦ टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करा.

67. Use dustbin properly. (यूज डस्टबिन प्रॉपरली)

✦ कचरापेटीचा योग्य वापर करा.

68. Don’t pluck flowers unnecessarily. (डोन्ट प्लक फ्लावर्स अननेसेसरीली)

✦ फुले उगाच तोडू नका.

69. Protect animals and birds. (प्रोटेक्ट अ‍ॅनिमल्स अँड बर्ड्स)

✦ प्राणी आणि पक्ष्यांचे रक्षण करा.

70. Keep your surroundings clean. (कीप युवर सराऊंडिंग्ज क्लीन)

✦ आपला परिसर स्वच्छ ठेवा.

🏃 Exercise & Health Habits (व्यायाम आणि आरोग्यासाठी)

71. Exercise daily. (एक्सरसाइज डेली)

✦ रोज व्यायाम करा.

72. Drink plenty of water. (ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर)

✦ भरपूर पाणी प्या.

73. Eat healthy food. (ईट हेल्दी फूड)

✦ आरोग्यदायी अन्न खा.

74. Sleep well at night. (स्लीप वेल अॅट नाईट)

✦ रात्री चांगली झोप घ्या.

75. Walk in the morning. (वॉक इन द मॉर्निंग)

✦ सकाळी चालायला जा.

76. Play outdoor games. (प्ले आउटडोर गेम्स)

✦ मैदानी खेळ खेळा.

77. Don’t eat too much sweets. (डोन्ट ईट टू मच स्वीट्स)

✦ जास्त गोड खाऊ नका.

78. Wash hands before and after meals. (वॉश हॅण्ड्स बिफोर अँड आफ्टर मील्स)

✦ जेवण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा.

79. Keep your body clean. (कीप युवर बॉडी क्लीन)

✦ आपले शरीर स्वच्छ ठेवा.

80. Avoid junk food. (अव्हॉइड जंक फूड)

✦ जंक फूड टाळा.

🛡️ Safety Habits (सुरक्षेसाठी)

81. Don’t talk to strangers. (डोन्ट टॉक टू स्ट्रेंजर्स)

✦ अनोळखी व्यक्तीशी बोलू नका.

82. Cross the road carefully. (क्रॉस द रोड केअरफुल्ली)

✦ रस्ता सुरक्षितपणे ओलांडा.

83. Don’t play near the road. (डोन्ट प्ले नियर द रोड)

✦ रस्त्याजवळ खेळू नका.

84. Wear a helmet while cycling. (वेअर अ हेल्मेट व्हाईल सायकलिंग)

✦ सायकल चालवताना हेल्मेट घाला.

85. Follow traffic rules. (फॉलो ट्रॅफिक रूल्स)

✦ वाहतुकीचे नियम पाळा.

86. Don’t touch electrical wires. (डोन्ट टच इलेक्ट्रिकल वायर्स)

✦ विजेच्या तारांना स्पर्श करू नका.

87. Keep sharp objects away. (कीप शार्प ऑब्जेक्ट्स अवे)

✦ धारदार /तीक्ष्ण वस्तू दूर ठेवा.

88. Don’t run in school corridors. (डोन्ट रन इन स्कूल कॉरिडॉर्स)

✦ शाळेत धावू नका.

89. Inform elders in case of danger. (इन्फॉर्म एल्डर्स इन केस ऑफ डेंजर)

✦ धोका असल्यास मोठ्यांना सांगा.

90. Don’t play with fire. (डोन्ट प्ले विथ फायर)

✦ आगीसोबत खेळू नका.

💡 Other Useful Daily Habits (इतर उपयोगी सवयी)

91. Keep your bag organized. (कीप युवर बॅग ऑर्गनाइज्ड)

✦ बॅग व्यवस्थित ठेवा.

92. Don’t shout indoors. (डोन्ट शाउट इंडोअर्स)

✦ घरात ओरडू नका.

93. Respect your teachers. (रिस्पेक्ट युवर टीचर्स)

✦ शिक्षकांचा आदर करा.

94. Share your pen and pencil. (शेअर युवर पेन अँड पेंसिल)

✦ पेन-पेन्सिल शेअर करा.

95. Keep your shoes in proper place. (कीप युवर शूज इन प्रॉपर प्लेस)

✦ तुमचे बूट योग्य जागी ठेवा.

96. Don’t make noise unnecessarily. (डोन्ट मेक नॉईज अननेसेसरीली)

✦ नको ते आवाज करू नका.

97. Take care of your pets. (टेक केअर ऑफ युवर पेट्स)

✦ तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.

98. Speak softly. (स्पीक सॉफ्टली)

✦ मृदू आवाजात/हळूवारपणे बोला.

99. Always be honest. (ऑलवेज बी ऑनिस्ट)

✦ नेहमी प्रामाणिक रहा.

100. Help someone in need. (हेल्प समवन इन नीड)

✦ गरज असलेल्या व्यक्तीस मदत करा.

Sentences for Kids' Good Habits. .

 100 इंग्रजी वाक्ये मुलांच्या चांगल्या सवयींसाठी.100 English Sentences for Kids' Good Habits. 

🧼 Personal Hygiene (वैयक्तिक स्वच्छतेसाठी वाक्ये)

1.  Brush your teeth twice a day. (ब्रश युवर टीथ ट्वाइस अ डे)

✦ दिवसातून दोन वेळा दात घास.

2.  Wash your hands before eating. (वॉश युवर हॅण्ड्स बिफोर ईटिंग)

✦ जेवण्यापूर्वी हात धुवा.

3.  Take a bath daily. (टेक अ बाथ डेली)

✦ रोज अंघोळ करा.

4.  Keep your nails clean. (कीप युवर नेल्स क्लीन)

✦ नखे स्वच्छ ठेवा.

5.  Comb your hair every morning. (कोम युवर हेअर एव्हरी मॉर्निंग)

✦ रोज सकाळी केस विंचरा.

6.  Wash your face regularly. (वॉश युवर फेस रेग्युलर्ली)

✦ चेहरा नियमित धुवा.

7.  Use a handkerchief. (यूज अ हॅन्करचिफ)

✦ रुमाल वापरा.

8.  Cover your mouth while sneezing. (कव्हर युवर माउथ व्हाईल स्नीझिंग)

✦ शिंकी देताना तोंड झाका.

9.  Keep your clothes clean. (कीप युवर क्लोथ्स क्लीन)

✦ कपडे स्वच्छ ठेवा.

10. Take care of your shoes. (टेक केअर ऑफ युवर शूज)

✦ आपले बूट सांभाळा.

🏠 Home & Room Habits (घर आणि खोलीसाठी)

11. Make your bed every morning. (मेक युवर बेड एव्हरी मॉर्निंग)

✦ रोज सकाळी अंथरुण आवरा.

12. Keep your room tidy. (कीप युवर रूम टायडी)

✦ खोली स्वच्छ ठेवा.

13. Put things back in place. (पुट थिंग्स बॅक इन प्लेस)

✦ वस्तू परत जागी ठेवा.

14. Switch off the lights when not needed. (स्विच ऑफ द लाईट्स व्हेन नॉट नीडेड)

✦ गरज नसताना लाईट बंद करा.

15. Don’t waste water. (डोन्ट वेस्ट वॉटर)

✦ पाणी वाया घालवू नका.

16. Don’t waste electricity. (डोन्ट वेस्ट इलेक्ट्रिसिटी)

✦ वीज वाया घालवू नका.

17. Take care of your toys. (टेक केअर ऑफ युवर टॉइज)

✦ तुमच्या खेळण्यांची काळजी घ्या.

18. Help your parents at home. (हेल्प युवर पॅरंट्स अॅट होम)

✦ घरात आई-वडिलांना मदत करा.

19. Don’t break things carelessly. (डोन्ट ब्रेक थिंग्स केअरलेस्ली)

✦ निष्काळजीपणे वस्तू तोडू नका.

20. Keep your study table clean. (कीप युवर स्टडी टेबल क्लीन)

✦ अभ्यासाची टेबल स्वच्छ ठेवा.

📚 Study & Learning Habits (अभ्यासाच्या सवयीसाठी वाक्ये)

21. Do your homework on time. (डू युवर होमवर्क ऑन टाइम)

✦ गृहपाठ वेळेत करा.

22. Revise your lessons daily. (रिव्हाईज युवर लेसन्स डेली)

✦ रोज पाठाचे पुनरावलोकन करा.

23. Listen carefully in class. (लिसन केअरफुल्ली इन क्लास)

✦ वर्गात नीट लक्षपूर्वक ऐका.

24. Read books every day. (रीड बुक्स एव्हरी डे)

✦ दररोज पुस्तके वाचा.

25. Ask questions if you don’t understand. (आस्क क्वेश्चन्स इफ यू डोन्ट अंडरस्टँड)

✦ काही समजले नाही तर प्रश्न विचारा.

26. Take notes while studying. (टेक नोट्स व्हाईल स्टडीइंग)

✦ अभ्यास करताना नोट्स घ्या.

27. Don’t copy from others. (डोन्ट कॉपी फ्रॉम ऑदर्स)

✦ दुसऱ्यांकडून कॉपी करू नका.

28. Keep your books organized. (कीप युवर बुक्स ऑर्गनाइज्ड)

✦ तुमची पुस्तके व्यवस्थित ठेवा.

29. Learn something new every day. (लर्न समथिंग न्यू एव्हरी डे)

✦ रोज काहीतरी नवीन शिका.

30. Be punctual for school. (बी पंक्चुअल फॉर स्कूल)

✦ शाळेत वेळेवर या.

🍎 Food & Eating Habits (अन्न आणि खाण्याच्या सवयी)

31. Eat fresh fruits daily. (ईट फ्रेश फ्रूट्स डेली)

✦ रोज ताजी फळे खा.

32. Drink milk every day. (ड्रिंक मिल्क एव्हरी डे)

✦ रोज दूध प्या.

33. Don’t eat junk food often. (डोन्ट ईट जंक फूड ऑफन)

✦ खारट/तळलेले अन्न जास्त खाऊ नका.

34. Wash fruits before eating. (वॉश फ्रूट्स बिफोर ईटिंग)

✦ फळं खाण्यापूर्वी धुवा.

35. Eat your meals on time. (ईट युवर मील्स ऑन टाइम)

✦ जेवण वेळेवर खा.

36. Chew your food properly. (च्यू युवर फूड प्रॉपरली)

✦ अन्न नीट चावून खा.

37. Don’t talk while eating. (डोन्ट टॉक व्हाईल ईटिंग)

✦ जेवत असताना बोलू नका.

38. Share your food with friends. (शेअर युवर फूड विथ फ्रेंड्स)

✦ तुमचे जेवण मित्रांसोबत शेअर करा.

39. Say “thank you” after receiving food. (से थॅंक यू आफ्टर रिसीविंग फूड)

✦ अन्न मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

40. Don’t waste food. (डोन्ट वेस्ट फूड)

✦ अन्न वाया घालवू नका.

🙏 Good Manners / Politeness (चांगले शिष्टाचार / सभ्य वर्तन)

41. Say “please” when asking for something. (से “प्लीज” व्हेन आस्किंग फॉर समथिंग)

✦ काही विचारताना “कृपया” म्हणा.

42. Say “thank you” after getting help. (से “थँक यू” आफ्टर गेटिंग हेल्प)

✦ मदत मिळाल्यावर “धन्यवाद” म्हणा.

43. Say “sorry” if you make a mistake. (से “सॉरी” इफ यू मेक अ मिस्टेक)

✦ चूक झाली तर “सॉरी” म्हणा.

44. Greet everyone politely. (ग्रीट एव्हरीवन पलाइटली)

✦ सर्वांना नम्रतेने अभिवादन करा.

45. Listen before speaking. (लिसन बिफोर स्पीकिंग)

✦ बोलण्यापूर्वी ऐका.

46. Don’t interrupt others. (डोन्ट इंटरप्ट ऑदर्स)

✦ इतरांना व्यत्यय आणू नका.

47. Share your toys with friends. (शेअर युअर टॉइज विथ फ्रेंड्स)

✦ मित्रांसोबत खेळणी शेअर करा.

48. Be kind to everyone. (बी काइंड टू एव्हरीवन)

✦ सर्वांसोबत नम्र राहा.

49. Say “excuse me” politely. (से “एक्सक्यूज मी” पलाइटली)

✦ एखाद्या वेळेस रस्ता मागताना “माफ करा” म्हणा.

50. Respect your elders. (रिस्पेक्ट युवर एल्डर्स)

✦ मोठ्यांचा आदर करा.

🤝 Helping Others (इतरांना मदत करणे)


महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात ..

 Mpsc मार्फत. महिला व बालविकास विभागात तब्बल २५८ पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्...