मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

 

     

    *डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे*

        *(क्रांती - हरीतक्रांती)*

 


    *जन्म : 7 नोव्हेंबर 1883*

               (वर्धा , महाराष्ट्र)

    *मृत्यू : 22 जानेवारी 1967*

                   (वय 83)

             (नागपूर , महाराष्ट्र)


संघटना : गदर पार्टी, 

              बर्लिन समिती, भारतीय 

              कम्युनिस्ट पार्टी

हालचाल : हिंदू-जर्मन षड्यंत्र , भारतीय कम्युनिझम


गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा भन्नाट प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. सात नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा धावता आढावा..


परकीय भूमीवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या एका क्रांतिकारकाची ही कहाणी आहे. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचे नाव. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अक्षरश: होम केला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने त्यांनी जगभर वणवण केली. इंडो-चायना, जपान, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानची सीमा, फ्रान्स, जर्मनी, रशिया, मेक्सिको अशी ही भ्रमंती १८ जानेवारी १९६७ ला शांत झाली.


७ नोव्हेंबर १८८६ रोजी वध्र्यात जन्मलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा आयुष्यपट चक्रावून टाकणारा आहे. वयाच्या २० व्या वर्षी मातृभूमीला पारखे झालेल्या या वीराची स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य आकांक्षा, परकीय ब्रिटिश सत्तेला शस्त्रास्त्रांच्या साहाय्यानेच देशाबाहेर घालवता येईल, ही पक्की मनोधारणा त्यांच्या जीवनप्रवासात जागोजागी दृष्टोत्पत्तीस येते. गदर चळवळींच्या प्रणेत्या खानखोजेंकडे प्रयोगशीलता होती. गदर चळवळीत, मेक्सिकोत शेती संशोधनांतही ती कामी आली; पण या प्रयोगशीलतेचा योग्य उपयोग आमचे शासनकर्ते करून घेऊ शकले नाहीत.

               लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली खानखोजेंनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावणीच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशिराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आदी क्रांतिकारक त्यांच्याबरोबर होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी अर्धे जग पालथे घातले, पृथ्वीप्रदक्षिणा केली, अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन्यत सेन, जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर हे त्यांचे आदर्श होते. दोघेही शेती क्रांतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच मेक्सिकोत त्यांनी कृषिक्रांती घडवून आणली. हे सगळे करीत असताना मायभूमीच्या ओढीने ते तीन वेळा भारतात आले. पैकी एकदा इराणी नाव, इराणी पासपोर्ट आणि इराणी वेश धारण करून १० जून १९१९ ला मुंबईत आले. लोकमान्य टिळकांना गुप्तपणे भेटले. त्यांनी भारतात न राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे परत पॅरिस, बर्लिन, मॉस्को असा प्रवास करून मेक्सिकोत स्थायिक झाले. मॉस्कोत लेनिनशी दोनदा भेट झाली. त्याअगोदर सन्यत सेनशी भेट झाली होती. १९२४ ते १९४९ असे २५ वर्षे भारताबाहेर मेक्सिकोत राहून ते कृषी सल्लागार म्हणून भारतात आले; पण पाच महिन्यांनंतर परत गेले. त्यानंतर फेब्रुवारी १९५० ते ऑगस्ट १९५१ असे दीड वर्षे ते भारतात राहिले; पण इथल्या शासनकर्त्यांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर नोव्हेंबर १९५५ मध्ये नागपूरला कायमच्या वास्तव्यासाठी आले ते केवळ मायभूमीत अखेरचा श्वास घ्यायचा म्हणून.

               खानखोजे हे कधी काळी तेलंगणातून आलेले कुटुंब असावे. त्यांच्या एका पूर्वजाने पुंडावा करणाऱ्या एका खानाला शोधून काढले होते. म्हणून त्यांचे नाव खानखोजे असे पडले. त्यांचे मातुल घराण्याचे आडनाव फत्तेखानी. एका पुंडावा करणाऱ्या खानाला त्यांनी पकडले म्हणून ते फत्तेखानी झाले. त्यांचे आजोबा व्यंकटेश हे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झाले होते. त्यांची भेट तंटय़ा भिल्लाशी झाली होती. त्याने त्यांना ब्रिटिशांशी लढा देण्यास सांगितले होते.

                    डॉ. खानखोजे माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर येथे आले. नील सिटी हायस्कूलचे ते विद्यार्थी. वयाच्या अठराव्या वर्षी या मुलाचे लग्न केले तर तो मार्गावर येईल या धारणेने त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न ठरवले, पण त्याने लग्नाच्या मांडवातून पलायन केले. बंगाली क्रांतिकारकांशी त्यांचा या सुमारास संपर्क आला. सखाराम देऊस्कर, ब्रह्मबांधव बंडोपाध्याय यांच्याशी भेट झाली. एक वेगळा प्रयोग म्हणून सर्कस चालू केली, पण हा प्रयोग फसला. सर्कस वादळात सापडली आणि अक्षरश: कोलमडली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला. ते पुण्यास टिळकांना भेटले. (१९०५) टिळकांनी त्यांना जपानला जाण्याचे सुचवले. १६ ऑक्टोबर १९०५ला लॉर्ड कर्झन यांनी वंगभंगाचा आदेश काढला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. ब्रिटिशांची दडपशाही वाढत होती. अशा वातावरणात हा सल्ला टिळकांनी त्यांना दिला होता.


खानखोजेंना भाऊ म्हटले जात असे. भाऊ प्रथम बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थाना भेटले. रामतीर्थानी त्यांना एक पत्र दिले. भाऊंना मोबासा येथे टाइमकीपरची नोकरी मिळाली, पण जायला मिळाले नाही. अमेरिकन वकिलातीने मदत केली, पण अमेरिकन जहाजाच्या ब्रिटिश कप्तानाने त्यांना प्रवेश नाकारला. नंतर मेसेंजर मेरिटाइम या जहाज कंपनीचे येरा हे जहाज कोलंबोपर्यंत जाणार होते, त्यावर ते हरकाम्या म्हणून नोकरीस लागले. पोलिसांनी कोलंबो येथे चौकशी केली, पण त्यातून ते सुटले. सायगाव येथे उतरल्यावर रिक्षावाल्याने त्यांना हिंदू देवळांत नेले. तेथील पुजारी तेलगू भाषिक. त्याच्याकडून बरीच माहिती मिळवली. पुढील प्रवासात हाँगकाँग, शांघाय येथे उतरू न दिल्याने योकोहामा येथे उतरले. कॅप्टनने त्यांच्यासाठी रदबदली केली. ते जपानी भाषेचे विद्यार्थी झाले. इथे त्यांना गोविंदराव पोतदारांची खूप मदत झाली. इंग्लिशचे वर्ग चालवले. जेवणखाण्याचे हाल होते. इथे त्यांनी इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. जहाजावर मित्र झालेल्या चिनी मित्रांच्या ओळखीने त्यांची सन्यत् सेनशी भेट झाली. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय शेती यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


खानखोजे यांनी या काळात स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. २ नोव्हेंबर १९०७ रोजी त्यांनी कोबे चेंबर ऑफ कॉमर्सपुढे भाषण दिले. याच काळात त्यांनी हिंदी विद्यार्थ्यांची क्रांती सेना स्थापन केली. १९०६ला सॅनफ्रान्सिस्को येथे भीषण भूकंप झाला होता. पुनर्वसनाच्या कामासाठी मजुरांची आवश्यकता होती. खानखोजे मजूर म्हणून खालच्या डेकचे स्वस्त तिकीट घेऊन सॅनफ्रान्सिस्को येथे गेले. सॅनफ्रान्सिस्को बंदरात त्यांना अडवण्यात आले. तू काय करणार आहेस? खानखोजे उत्तरले. ‘विद्यार्जन’. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला. बर्कलेला त्यांचे मित्र (सर्व बंगाली) भेटले. एका हॉटेलात भांडी विसळण्याचे काम मिळाले, पण ते नीट होईना म्हणून मालकाने त्यांना काढून टाकले. नंतर एका रुग्णालयात बशा धुण्याचे काम मिळाले. पगार नव्हता, पण राहायला जागा आणि तीन वेळ खाना होता. त्यांनी ‘इंडिया इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली. बर्कले विद्यापीठात त्यांनी शेतीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आठवडाअखेर रेल्वेरुळांवर खडी वाहून नेण्याचे हे काम केले. हॉम नावाची सुगंधी फुले वेचली. ही हिरव्या रंगाची फुले बीअरमध्ये वापरत असत.


तिथून ते सॅक्रोमेंटोला पोहोचले. त्यांनी शेतात काम केले. त्यांचा अनेक पंजाब्यांशी परिचय झाला. मेक्सिकन क्रातिकारकांशी घनिष्ठ परिचय झाला. तो पुढे उपयोगी पडला. पोर्टलंड येथे अशिक्षितपणाचे सोंग आणून लाकूड फॅक्टरीत काम मिळवले. १९१०मध्ये त्यांनी शेतीशास्त्राची कॉर्नवालिसची पदवी मिळाली. राफेल येथील मिलिटरी अ‍ॅकॅडमीत वेटरचे काम मिळाले. तेथे सैनिक प्रशिक्षणही घेतले. इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. पीरखान या नावाने सीएटल, सॅक्रोमेंटो, सॅनफ्रान्सिस्को येथे शाखा काढल्या. वॉशिंग्टन स्टार विद्यापीठात जेनेटिक्सचा अभ्यास केला. स्पोकेन येथे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांत काम केले. पिंगळे, हरदयाळ यांच्या संपर्कात आले. आझाद हिंद पक्षाचे गदर पार्टी असे नामकरण झाले. त्यांना स्वत:ला गदर हे नाव पसंत नव्हते. (१९१३) युगांतर आश्रमाची स्थापना झाली. जर्मनीने उघड पाठिंबा दिला.


याच काळात सम फॅक्टर्स विच इनफ्लुएन्स द वॉटर रिक्वायरमेंट ऑफ प्लान्टस् हा प्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला. (दुर्जल कृषीशास्त्र) एम.एस. पदवी मिळवली. पुलमन येथे सॉइल फिजिक्स प्रयोगशाळेत काम केले. अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनची लाइफ मेंबरशिप मिळवली. भारतावर सिनेस्लाइड्सच्या साहाय्याने व्याख्याने देणे चालू केले. हिंदू असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेची स्थापना केली. गनिमी युद्धाची तयारी सुरू झाली. जुलै १३मध्ये कॉव्‍‌र्हरची भेट झाली. मिनेसोटा विद्यापीठांत पीएच.डी.साठी त्यांनी नाव नोंदवले. पण पहिले महायुद्ध चालू झाले. खानखोजे आणि त्यांचे सहकारी सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करू लागले. पीएच.डी. मागे पडली. याच वेळेला कोमागाटा मारू प्रकरण झाले.


कोमागोटा मारूचा गदर चळवळीशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, पण खानखोजे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. चळवळीच्या प्रहारक विभागाचे खानखोजे प्रमुख होते. दहा हजार स्वयंसेवक लढण्यासाठी तयार होते. त्यांच्या वेगवेगळय़ा तुकडय़ा करून भारतात शिरण्याची योजना होती. जर्मनीचा उघड पाठिंबा होता. भारतीय जनतेस जागे करण्यासाठी एम्डेनने पूर्व किनाऱ्यावर हल्ला केला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. खानखोजे पीएच.डी. अर्धवट टाकून निघाले. न्यूयॉर्कला भारतीय पासपोर्ट मिळाला नाही तेव्हा तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तानमार्गे शिरण्याची योजना झाली. सप्टेंबर १९१४ मध्ये तिघे जण निघाले. आगाशे (मिर्झा महमद अली), खानखोजे (महमदखान), कोचर (दाऊदखान) यापैकी आगाशे यांच्याकडे इराणीयन पासपोर्ट होता. इराणी जेन्डार्मीत ते मोठय़ा हुद्दय़ावर होते. न्यूयॉर्क, अथेन्स, पिरओस- वेगवेगळ्या जहाजांनी, स्मर्नास रेल्वेने आले. कोचर यास प्रचार साहित्यासह जहाजाने मुंबईत पाठवले. पण त्यास पंजाबात पकडण्यात आले. खानखोजे यांचा पुढचा प्रवास इस्तंबुल (सप्टेंबर १९१४), बगदाद (डिसेंबर १९१४), पुस्तइकुत (फेब्रवारी १९१५), बुशायर (मार्च १९१५) असा झाला. इस्कोनडेरेन येथे रेल्वेवर ब्रिटिश विमानांनी हल्ला केला. ते थोडक्यात बचावले. पर्शियात त्यांनी महमदखान हे नाव घेतले होते. पर्शियन सीमेपर्यंत जाण्यासाठी रात्रीच्या वेळी होडीतून २०० मैल जावे लागले. पर्शिया जर्मनीच्या बाजूने होता. देशफुल येथे ब्रिटिश हल्ल्यामुळे रातोरात पळावे लागले. बुशायर येथे जनानखान्यात लपावे लागले. नंतर जनान्याबरोबरच ते शहराच्या बाहेर पडले. शिराजला एप्रिल १९१५, निरीज ऑगस्ट १९१५, केरमान नोव्हेंबर १९१५, ३५० मैल वाळवंटी प्रवास करून बलुचिस्तान सीमेपर्यंत आले. गदरचे हंगामी सरकार १ डिसेंबर १९१५ ला स्थापन केले. जर्मनी, तुर्की, हंगेरी या सरकारांनी मान्यता दिली, पण फासे उलटे पडू लागले होते. स्थानिक सुलतान दगाबाज निघाला. खानखोजे यांना उंटावरून पळ काढावा लागला. काही गदर सैनिक मेले. बाफ्त येथे बर्फाच्छादित पर्वतराजींतून प्रवास  झाला. इथे ते इंग्रजांचे कैदी झाले. पण ते बहाई सुन्नी शिपायांत स्वातंत्र्याचा प्रचार करीत राहिले. त्यांनी खानखोजेंची साखळदंडांतून मुक्तता केली. रात्री त्यांनी छावणीतून पलायन केले. एका गुहेत राहिले. पोट बिघडले होते. उपाशी, खोकला, ताप होता असताना बर्फाळ उतारावरून स्वत:ला खाली झोकून दिले. दोन टोळीवाल्यांनी त्यांना पकडले. त्यांच्या प्रमुखाने त्यांना आश्रय दिला, पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी दरवेशाचा वेश घातला आणि पळाले. नाही तर युद्धकैदी झाले असते. बलुची टोळीत वर्षभर राहिले. याच काळात त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. पर्शियन युद्ध थांबले होते. ब्रिटिशांनी पर्शियन सरदाराने खानखोजे यांना स्वाधीन करावे असे सांगितले होते. खानखोजे काशघईच्या वेषांत पळाले म्हणून वाचले. उरुजान येथे प्रयाण केले. काशगई प्रमुख सहामे याचे ते स्वीय सहायक बनले. १ डिसेंबर १९१५ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात स्वतंत्र हिंदुस्थानाचे सरकार अस्तित्वात होते. इराणी बलुचिस्तानच्या भागात ते होते. उरुजान येथे ते इंग्लिश आणि शेतीशास्त्र शिकवू लागले. याच सुमारास सुलतान आजारी झाला आणि उपचारासाठी त्याला मुंबईमार्गे युरोपला जायचे होते. खानखोजे त्याच्याबरोबरच मुंबईत आले. गिरगावात पोतदार यांच्यामार्फत टिळकांना भेटले.


टिळकांनी खानखोजे यांना पर्शियात परत जायला सांगितले. गदर चळवळ संपली होती. त्याची अनेक कारणे होती. १) भारतीय जनतेचा अनुत्साह. २) एम्डेन प्रकरणांनंतर जर्मनीचा भारतीय स्वातंत्र्य लढय़ांतील उत्साह कमी झाला होता. ब्रिटिश सरकारने ४३ फरारी क्रांतिकारकांची नावे घोषित केली. त्यांच्यावर मृत्यूचा हुकूमनामा होता. खानखोजे यांचे नाव त्यात होते. काळ्या यादीतले नाव स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काढले गेले नव्हते. ३) महायुद्धात हरल्याने जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी याचा पाठिंबा गेला. ४) खुद्द पंजाबमध्ये या चळवळीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ५) कोमागाटा मारूच्या प्रकरणातील एकही जण पंजाबपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे जनजागृती झाली नाही. ६) गदर चळवळीला खालसा दिवाणचा पाठिंबा नव्हता. ७) किरपालसिंग फितूर झाला. ४२ जण फांशी गेले, ११४ ना काळेपाणी, ९३ सश्रम कारावास, कर्तारसिंग, पिंगळे हे फाशी गेले.


नोव्हेंबर १९२१ मध्ये सुलतानचे प्रमाणपत्र घेऊन खानखोजे जर्मनीत गेले. रशियास भेट दिली. गदर चळवळीत तीन गट झाले होते. एम्. एन्. रॉय उघडपणे लेनिनवादी होते. कम्युनिझम प्रथम, स्वातंत्र्य नंतर, अशी त्यांची भूमिका होती. खानखोजे आधी स्वातंत्र्य, मग साम्यवाद अशी भूमिका मांडत होते. लेनिनशी त्यांची दोनदा भेट झाली होती. रॉय गट गदर क्रांतिकारकांविरुद्ध जात होता, अशी शंका होती. त्यामुळे रशिया वा जर्मनीत वावरणे धोक्याचे झाले होते. काही गदर कार्यकर्त्यांचा रहस्यमय शेवट झाला होता. बर्लिनमध्येही राहणे धोक्याचे होते. अमेरिका ब्रिटनच्या बाजूने उतरली होती. अमेरिकेतील सर्व गदर मालमत्ता जप्त करण्यात आली होती.


खानखोजे यांनी सर्व विचारांती मेक्सिकोत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या मेक्सिकन क्रांतिकारकांबरोबर मोलमजुरी केली होती, त्यापैकी काही आता स्वतंत्र मेक्सिकोत मोठय़ा पदावर होते. रोमन नेग्री हे शेतीमंत्री झाले होते. जानेवारी १९२४ मध्ये खानखोजा मेक्सिकोत दाखल झाले. स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्यांना आठ भाषा येत होत्या. पण स्पॅनिश येत नव्हती. प्रस्तुत लेखकाला १९५६-५७ मध्ये नागपूरला नोकरीनिमित्ताने मादाम जान खानखोजेंकडून फ्रेंच शिकण्याची संधी मिळाली.


खानखोजे यांनी जेनेटिक्समध्ये संशोधन केले. गव्हाची अनेक नवीन वाणे तयार केली. मक्याच्या जनुकांत मूलभूत फेरफार करून मक्याच्या एका कणसाचे उत्पन्न पाचपट केले. खानखोजे शेतकऱ्यांचे देव बनले. ख्रिस्ताच्या बरोबरीने त्यांची छायाचित्रे घराघरांतून लागली. मक्याच्या एकेका ताटावर तीस-तीस कणसे. मक्याची निर्यात वाढली. शेतकऱ्याकडे पैसा आला. खानखोजे यांना चापिंगोचा जादूगार असे नांव मिळाले. चापिंगो त्यांचे राहण्याचे गाव. तूर, चवळी, जंगली वाल, सोया डाळ, शेवगा यावर त्यांनी संशोधन केले. अगदी निवडुंगावरसुद्धा. मेक्सिकन रेल्वेने त्यांना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीसाठी दिली. त्यांनी ‘जेनेटिक्स’ हा विषय शिकवला. १९३१-३२ मध्ये मेक्सिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते पॅरिस, बेल्जियम, जर्मनी येथे गेले. परत आल्यावर त्यांनी व्हेराक्रूझ येथे डाळिंबाची नवी जात विकसित केली. १९३६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी २७ वर्षांनी तरुण असलेल्या जान सिंड्रिक तरुणीशी विवाहबद्ध झाले. जानची जानकी झाली. मेक्सिकोतील बेल्जियम कॉन्सलरची ती मेव्हणी होती. तिने त्यांना मागणी घातली. खानखोजे रेल्वेचे शेतीखातेप्रमुख झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी रबरावर संशोधन करून त्याचे उत्पन्न वाढवले.  १९२७ मध्ये खानखोजे यांच्यावरील बंदी उठवावी, असा प्रयत्न माधव अणे यांनी केला, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, मेक्सिकोतील खाणधंद्यात गुंतलेली त्यांची सगळी रक्कम बुडाली. १९१९ च्या गुप्त भेटीनंतर एप्रिल १९४९ मध्ये मध्य प्रदेश सरकारचे पाहुणे म्हणून आले. पण विमानतळावर त्यांना १२ तास थांबावे लागले. कारण त्यांचे नाव काळ्या यादीत होते. सप्टेंबर १९४९ मध्ये ते परत गेले. मार्च १९५० ला परत आले. जून १९५१ ला परत गेले. ३० नोव्हेंबर १९५५ ला वयाच्या ७० व्या वर्षी ते भारतात कायमसाठी आले.


ते नागपूर वसतिगृहात सुपिरटेंडेंट होते. लक्ष्मी नारायण इन्टिटय़ूटमध्ये ते जर्मन शिकवीत, नागपूर रेडिओवर व्याख्याने देत. भारत सरकारने १९६३ पासून त्यांना २५० रुपये पेन्शन म्हणून चालू केले. त्यांचा मृत्यू २२ जानेवारी १९६७ ला झाला. १९६१ मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांच्या पत्नीने फ्रेंच ट्रान्सलेटर म्हणून काम केले. फ्रेंच भाषेचे वर्ग चालवले. त्यांना १९८१ मध्ये नागरिकत्व मिळाले. त्यांचा मृत्यू जुलै १९९१ ला दिल्ली येथे झाला. त्यांची मोठी मुलगी सावित्री भारतात स्थायिक झाली. धाकटी कॅनडात स्थायिक झाली.


(संदर्भ -खानखोजे यांच्या कार्याचा उल्लेख अनेक पुस्तकांतून आलेला आहे. ‘रणझुंजार डॉ. पां. स. खानखोजे यांचे चरित्र’ (ग. वि. केतकर), ‘कथा एका क्रांतिकारकाची’ (म. ना. काळे) ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली. क्रांतिकार्यविषयक अनेक पुस्तकांतून त्यांच्या कार्याचा उल्लेख झाला आहे. 


📚 *अलीकडील तीन पुस्तके आहेत.*


१. नाही चिरा- वीणा गवाणकर १९९७ राजहंस


२. आय शाॕल नॉट आस्क फॉर पार्डन – सावित्री साहनी २०११ (पेंग्विन)


३. क्रांती आणि हरित क्रांती- उपरोक्तचा मराठी अनुवाद.

    

          🇮🇳 *जयहिंद*🇮🇳



बिपिनचन्द्र पाल..

 

         *बिपिनचन्द्र पाल*                                                                                                                            (भारतीय क्रांतिकारी) 

      *जन्म : 7 नवंबर, 1858*

(हबीबगंज ज़िला, (वर्तमान बांग्लादेश)

      *मृत्यु : 20 मई, 1932*

नागरिकता : भारतीय

प्रसिद्धि : स्वतन्त्रता सेनानी, शिक्षक, पत्रकार, लेखक

पार्टी : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, ब्रह्म समाज

विशेष योगदान : विपिन चन्द्र कांग्रेस के क्रान्तिकारी देशभक्तों लाला लाजपत राय, बाल गंगाधर तिलक और विपिन चन्द्र पाल (लाल बाल पाल) की तिकड़ी का हिस्सा थे।

आंदोलन : भारतीय स्वतंत्रता संग्राम

अन्य जानकारी : 'वंदे मातरम्' पत्रिका के संस्थापक रहे बिपिन चंद्र पाल एक समाज सुधारक भी थे, जिन्होंने परिवार के विरोध के बावज़ूद एक विधवा से विवाह किया था।

             बिपिन चंद्र पाल  का नाम भारत के स्वाधीनता संग्राम के इतिहास में 'क्रान्तिकारी विचारों के जनक' के रूप में आता है, जो अंग्रेज़ों की चूलें हिला देने वाली 'लाल' 'बाल' 'पाल' तिकड़ी का एक हिस्सा थे।


👱‍♂️ *जन्म*

         बंगाल में हबीबगंज ज़िले के पोइल गाँव (वर्तमान में बांग्लादेश) में 7 नवम्बर 1858 को जन्मे विपिन चन्द्र पाल बहुमुखी प्रतिभा के धनी थे। वह शिक्षक और पत्रकार होने के साथ-साथ एक कुशल वक्ता और लेखक भी थे। इतिहासकार वी. सी. साहू के अनुसार विपिन चन्द्र कांग्रेस के क्रान्तिकारी देशभक्तों लाला लाजपत राय, बाल गंगाधर तिलक और विपिन चन्द्र पाल (लाल बाल पाल) की तिकड़ी का हिस्सा थे, जिन्होंने 1905 में बंगाल विभाजन के विरोध में ज़बर्दस्त आंदोलन चलाया था।      💁‍♂️ *जीवन परिचय*

                'वंदे मातरम्' पत्रिका के संस्थापक रहे पाल एक बड़े समाज सुधारक भी थे, जिन्होंने परिवार के विरोध के बावज़ूद एक विधवा से शादी की। बाल गंगाधर तिलक की गिरफ़्तारी और 1907 में ब्रितानिया हुकूमत द्वारा चलाए गए दमन के समय पाल इंग्लैंण्ड गए। वह वहाँ क्रान्तिकारी विधार धारा वाले 'इंडिया हाउस' से जुड़ गए और 'स्वराज पत्रिका' की शुरुआत की। मदन लाल ढींगरा के द्वारा 1909 में कर्ज़न वाइली की हत्या कर दिये जाने के कारण उनकी इस पत्रिका का प्रकाशन बंद हो गया और लंदन में उन्हें काफ़ी मानसिक तनाव से गुज़रना पड़ा। इस घटना के बाद वह उग्र विचारधारा से अलग हो गए और स्वतंत्र देशों के संघ की परिकल्पना पेश की। पाल ने कई मौक़ों पर महात्मा गांधी की आलोचना भी की। 1921 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अधिवेशन में पाल ने अध्यक्षीय भाषण में गांधीजी की आलोचना करते हुए कहा था-

आप जादू चाहते हैं, लेकिन मैं तर्क में विश्वास करता हूँ। आप मंत्रम चाहते हैं, लेकिन मैं कोई ऋषि नहीं हूँ और मंत्रम नहीं दे सकता।

🇮🇳 *आजादी में योगदान*

                    वंदे मातरम् राजद्रोह मामले में भी अरबिंदो घोष के ख़िलाफ़ गवाही देने से इंकार करने के कारण वह छह महीने जेल में रहे। देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहर लाल नेहरू ने 1958 में पाल की जन्मशती के मौक़े पर अपने सम्बोधन में उन्हें एक ऐसा महान् व्यक्तित्व क़रार दिया, जिसने धार्मिक और राजनीतिक मोर्चों पर उच्चस्तरीय भूमिका निभाई। पाल ने आज़ादी की लड़ाई के दौरान विदेशी कपड़ों की होली जलाने और हड़ताल जैसे आंदोलनों में बढ़-चढ़कर भूमिका निभाई।


🪔  *निधन*

               विपिनचन्द्र पाल 1922 में राजनीतिक जीवन से अलग हो गए और 20 मई, 1932 में अपने निधन तक राजनीति से अलग ही रहे।

                                                                                               

         

हवाई दल कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT)

 AFCAT २०२६-१ साठी अर्ज प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ९ डिसेंबरपर्यंत AFCAT च्या अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


AFCAT म्हणजे काय याबद्दल अधिक जाणून घेऊया. AFCAT द्वारे कोणती पदे उपलब्ध आहेत? AFCAT साठी कोण अर्ज करू शकते? उदाहरणार्थ, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहेत? चला याबद्दल जाणून घेऊया.

AFCAT म्हणजे काय?

हवाई दल कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) दरवर्षी दोनदा घेतली जाते. ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी यशस्वी उमेदवारांना हवाई दलाच्या विविध शाखांमध्ये रोजगाराच्या संधी प्रदान करते. भारतीय हवाई दलात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी AFCAT ही अनिवार्य प्रवेश परीक्षा आहे. जानेवारी २०२७ मध्ये AFCAT भरतीसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

AFCAT साठी पात्र उमेदवारांना भारतीय हवाई दलात फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल ब्रांच) आणि ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल ब्रांच) सारख्या पदांवर नियुक्त केले जाते.

कसा करावा अर्ज
AFCAT २०२६-१ साठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या.

वेबसाइटच्या होमपेजवरील AFCAT १ २०२६ ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

एक वेबपेज उघडेल. तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

पुढील नोंदणी प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती प्रविष्ट करा.

शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि तो प्रिंट करा.

काय आहे पात्रता
AFCAT साठी वयोमर्यादेबाबत, १८ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेबाबत, ६०% गुणांसह पदवीधर फ्लाइंग ब्रांचसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडे १२ व्या वर्गात भौतिकशास्त्र आणि गणित असणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी पदवीधर ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) साठी अर्ज करू शकतात आणि ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) साठी कोणत्याही प्रवाहात ६०% गुणांसह पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

पदवीधर मतदार नोंदणी 2025

 नोंदणी करण्याची मुदत 6 नोव्हेंबर 2025 आहे..

https://mahaelection.gov.in




आपले नाव मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी अधिकृत लिंक:  

👉 https://electoralsearch.eci.gov.in — ही भारत निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट आहे.


🗳️ मतदार यादीत नाव कसे शोधावे?


तुमच्याकडे असलेला EPIC क्रमांक (मतदान कार्डवरील क्रमांक) किंवा तुमचे वैयक्तिक तपशील वापरून तुम्ही नाव शोधू शकता:


1. EPIC क्रमांक वापरून:

- वरील लिंकवर क्लिक करा

- “Search by EPIC No.” पर्याय निवडा

- EPIC क्रमांक, राज्य, आणि कॅप्चा कोड टाका

- “Search” बटनावर क्लिक करा


2. वैयक्तिक तपशील वापरून:

- “Search by Details” पर्याय निवडा

- तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख/वय, राज्य, जिल्हा, आणि विधानसभा क्षेत्र निवडा

- कॅप्चा कोड टाकून “Search” क्लिक करा


3. मोबाईल नंबर वापरून (जर EPIC सोबत लिंक केलेला असेल):

- “Search by Mobile” पर्याय निवडा

- मोबाईल नंबर टाका → OTP मिळवा → OTP टाकून “Search” क्लिक करा.


📱 मोबाईल अ‍ॅप पर्याय:  

तुम्ही “Voter Helpline” अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करूनही नाव शोधू शकता.

NET exam 2025

 Opening of the online registration portal for submission of Online Application Form for UGC-NET December 2025 examination - reg.


The NTA has been entrusted by the University Grants Commission (UGC) with the task of conducting UGC-NET, which is a test to determine the eligibility of Indian nationals for (i) 'award of Junior Research Fellowship and appointment as Assistant Professor', (ii)'appointment as Assistant Professor and admission to Ph.D. and (iii)'admission to Ph.D. only' in Indian universities and colleges.


The National Testing Agency (NTA) will conduct UGC-NET December 2025 for 85 subjects in Computer Based Test (CBT) mode, as per Schedule given in table below:


Submission of Online Application Form


07 October 2025 to 07th November 2025


(upto 11:50 P.M.)


Last date for submission of Examination fee (through Credit Card/Debit Card/Net Banking/UPI


07th November 2025


Correction in the Particulars in Online Application Form


(upto 11:50 P.M.)


Announcement of Exam City


10th November 2025 to 12th November 2025


(upto 11:50 P.Μ.)


Downloading of Admit Card


To be Intimated Later


Date of Examination


To be Intimated Later


To be Intimated Later


Centre, Date and Shift


As indicated on Admit Card


Display of Recorded Responses and Answer Key(s)


To be announced later on the website


Website


https://ugc.net.nta.nic.in/www.nta.ac.in


General/Unreserved


Rs. 1150/-


General-EWS/OBC-NCL


Rs. 600/-


Application Fee


SC/ST/PWD


Third Gender


Rs. 325/-


Important Instructions:


1. Candidates can apply for UGC NET December 2025 through the "Online" mode only through the website https://ugcnet.nta.nic.in/.


2. Submission of the Online Application Form may be done by accessing the NTA website https://ugcnet.nta.nic.in/. The Application Form in any other mode will not be accepted.


3. Only one application is to be submitted by a candidate.


4. Candidates must strictly follow the instructions given in the Information Bulletin. available on the NTA website. Candidates not complying with the instructions shall be summarily disqualified.


5. Candidates must ensure that the e-mail address and Mobile Number provided in the Online Application Form are their own or Parents/Guardians only and accessible, as all information/ communication will be sent by NTA through e-mail on the registered e-mail address or SMS on the registered Mobile Number only.

6. In case candidate faces difficulty in applying for UGC NET December 2025, please contact on 01140759000/ 011 69227700 or e-mail at ugcnet@nta.ac.in for any clarification related to the UGC-NET December 2025.


7. Candidates must fill in their particulars carefully, as no changes will be a the final submission of the Application Form. As far as possible, cai advised to use Aadhaar verification while completing the Application F will facilitate the registration and examination process, particularly at the centres, as also the processing of their JRF.

गती व गतीचे प्रकारा आधारित टेस्ट

गती व गतीचे प्रकार आधारित टेस्ट

⚙️ गती व गतीचे प्रकार आधारित ऑनलाइन टेस्ट ⚙️

1. वस्तूच्या स्थितीत वेळेनुसार बदल होणे म्हणजे काय?

बल
गती
वेग
त्वरण

2. एका दिशेने सरळ रेषेत होणारी गती कोणती?

सरळरेषीय गती
वर्तुळाकार गती
दोलन गती
अनियमित गती

3. पंखा फिरतो, तो कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे?

वर्तुळाकार गती
दोलन गती
सरळरेषीय गती
मिश्र गती

4. घड्याळाच्या लंबकाची गती कोणत्या प्रकारची असते?

सरळरेषीय
वर्तुळाकार
दोलन गती
अनियमित गती

5. एका वस्तूची गती दुसऱ्या वस्तूच्या तुलनेत बदलली की आपण तिला काय म्हणतो?

स्थित वस्तू
गतीमान वस्तू
जडत्व
बलमान वस्तू

6. रस्त्यावर धावणारी बस कोणत्या गतीचे उदाहरण आहे?

वर्तुळाकार
सरळरेषीय
दोलन
मिश्र

7. चाक फिरते ही कोणत्या गतीचे उदाहरण आहे?

वर्तुळाकार गती
दोलन गती
सरळरेषीय गती
अनियमित गती

8. दोलन गतीचे दुसरे नाव काय आहे?

नियमित गती
कंप गती
परिपथ गती
स्थिर गती

9. पंख्याची गती कोणत्या प्रकारात मोडते?

दोलन गती
सरळरेषीय गती
वर्तुळाकार गती
अनियमित गती

10. गती ही कोणावर अवलंबून असते?

वेळ आणि अंतरावर
वजनावर
बलावर
तापमानावर

11. झोका ही कोणत्या प्रकारची गती आहे?

वर्तुळाकार
दोलन
सरळरेषीय
अनियमित

12. एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रकारची गती असल्यास तिला काय म्हणतात?

मिश्र गती
सरळरेषीय गती
वर्तुळाकार गती
अनियमित गती

13. पृथ्वीची स्वतःभोवतीची गती कोणत्या प्रकारात मोडते?

दोलन गती
वर्तुळाकार गती
सरळरेषीय गती
मिश्र गती

14. पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही कोणती गती आहे?

वर्तुळाकार गती
दोलन गती
सरळरेषीय गती
अनियमित गती

15. ज्यामध्ये वस्तू एकाच बिंदूपासून पुढे मागे हालते ती गती कोणती?

दोलन गती
वर्तुळाकार गती
सरळरेषीय गती
अनियमित गती

16. मनुष्य सायकल चालवतो ही कोणत्या प्रकारची गती आहे?

सरळरेषीय
मिश्र
दोलन
वर्तुळाकार

17. दोलन गतीला आणखी काय म्हणतात?

आवर्तन गती
स्थिर गती
अवर्तनीय गती
अनियमित गती

18. रस्त्यावर चालणारी गाडी कोणत्या प्रकारची गती आहे?

सरळरेषीय
वर्तुळाकार
दोलन
मिश्र

19. गती मोजण्यासाठी कोणत्या दोन घटकांची आवश्यकता असते?

वेळ आणि अंतर
बल आणि वस्तू
तापमान आणि दिशा
दाब आणि घनता

20. गतीचे मूलभूत प्रकार किती आहेत?

दोन
चार
तीन
पाच

मूलद्रव्यांच्या मराठी संज्ञा



मूलद्रव्यांच्या मराठी संज्ञा


अणुक्रमांक मराठी नाव रासायनिक संकेत इंग्रजी नाव

1 हायड्रोजन H Hydrogen

2 हेलियम He Helium

3 लिथियम Li Lithium

4 बेरिलियम Be Beryllium

5 बोरॉन B Boron

6 कार्बन C Carbon

7 नत्रवायू N Nitrogen

8 प्राणवायू O Oxygen

9 फ्लोरीन F Fluorine

10 निऑन Ne Neon

11 सोडियम Na Sodium

12 मॅग्नेशियम Mg Magnesium

13 ॲल्युमिनियम Al Aluminium

14 सिलिकॉन Si Silicon

15 स्फुरद P Phosphorus

16 गंधक S Sulfur

17 क्लोरीन Cl Chlorine

18 ॲरगॉन Ar Argon

19 पालाश K Potassium

20 कॅल्शियम Ca Calcium

21 स्कॅन्डियम Sc Scandium

22 टायटॅनियम Ti Titanium

23 व्हेनेडियम V Vanadium

24 क्रोमियम Cr Chromium

25 मॅंगनीज Mn Manganese

26 लोखंड Fe Iron

27 कोबाल्ट Co Cobalt

28 निकेल Ni Nickel

29 तांबे Cu Copper

30 जस्त Zn Zinc

31 गॅलियम Ga Gallium

32 जर्मेनियम Ge Germanium

33 आर्सेनिक As Arsenic

34 सेलेनियम Se Selenium

35 ब्रोमिन Br Bromine

36 क्रिप्टॉन Kr Krypton

37 रुबिडियम Rb Rubidium

38 स्ट्रॉन्शियम Sr Strontium

39 इट्रियम Y Yttrium

40 झिर्कोनियम Zr Zirconium

41 नायोबियम Nb Niobium

42 मॉलिब्डेनम Mo Molybdenum

43 टेक्नेटियम Tc Technetium

44 रुथेनियम Ru Ruthenium

45 रोडियम Rh Rhodium

46 पॅलेडियम Pd Palladium

47 चांदी Ag Silver

48 कॅडमियम Cd Cadmium

49 इंडियम In Indium

50 कथील Sn Tin

51 अँटिमनी Sb Antimony

52 टेलुरियम Te Tellurium

53 आयोडिन I Iodine

54 झेनॉन Xe Xenon

55 सिझियम Cs Caesium

56 बेरियम Ba Barium

57 लॅन्थनम La Lanthanum

58 सेरियम Ce Cerium

59 प्रॅसिओडायमियम Pr Praseodymium

60 नियोडायमियम Nd Neodymium

61 प्रोमेथियम Pm Promethium

62 सॅमेरियम Sm Samarium

63 युरोपियम Eu Europium

64 गॅडोलिनियम Gd Gadolinium

65 टेर्बियम Tb Terbium

66 डिस्प्रोसियम Dy Dysprosium

67 होल्मियम Ho Holmium

68 अर्बियम Er Erbium

69 थुलियम Tm Thulium

70 यटरबियम Yb Ytterbium

71 लुटेटियम Lu Lutetium

72 हाफ्नियम Hf Hafnium

73 टँटलम Ta Tantalum

74 टंगस्टन W Tungsten

75 र्हेनियम Re Rhenium

76 ओस्मियम Os Osmium

77 इरिडियम Ir Iridium

78 प्लॅटिनम Pt Platinum

79 सोने Au Gold

80 पारा Hg Mercury

81 थॅलियम Tl Thallium

82 शिसे Pb Lead

83 बिस्मथ Bi Bismuth

84 पोलोनियम Po Polonium

85 अॅस्टाटिन At Astatine

86 रॅडॉन Rn Radon

87 फ्रान्सियम Fr Francium

88 रेडियम Ra Radium

89 ॲक्टिनियम Ac Actinium

90 थोरियम Th Thorium

91 प्रोटॅक्टिनियम Pa Protactinium

92 युरेनियम U Uranium

93 नेप्चुनियम Np Neptunium

94 प्लुटोनियम Pu Plutonium

95 अमेरिशियम Am Americium

96 क्युरियम Cm Curium

97 बर्केलियम Bk Berkelium

98 कॅलिफोर्नियम Cf Californium

99 आइन्स्टाइनियम Es Einsteinium

100 फर्मियम Fm Fermium

101 मेंडेलेव्हियम Md Mendelevium

102 नोबेलियम No Nobelium

103 लॉरेन्सियम Lr Lawrencium

104 रुदरफोर्डियम Rf Rutherfordium

105 डब्नियम Db Dubnium

106 सीबोर्जियम Sg Seaborgium

107 बोह्रियम Bh Bohrium

108 हासियम Hs Hassium

109 मैटनेरियम Mt Meitnerium

110 डार्मस्टाटियम Ds Darmstadtium

111 रॉंटजेनियम Rg Roentgenium

112 कोपरनिशियम Cn Copernicium

113 निहोनियम Nh Nihonium

114 फ्लेरोव्हियम Fl Flerovium

115 मॉस्कोव्हियम Mc Moscovium

116 लिव्हरमोरियम Lv Livermorium

117 टेनेसीन Ts Tennessine

118 ओगनेसन Og Oganesson



महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट

महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट

सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तर निवडा. सबमिट करा → स्कोअर पहा.

प्रश्न 1

महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

प्रश्न 2

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे?

प्रश्न 3

महाराष्ट्राचा राज्य फूल कोणते आहे?

प्रश्न 4

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

प्रश्न 5

महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता आहे?

प्रश्न 6

महाराष्ट्राचा राज्य गीत कोणते आहे?

प्रश्न 7

महाराष्ट्राचा राज्य नृत्य कोणते आहे?

प्रश्न 8

महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे?

प्रश्न 9

महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता आहे?

प्रश्न 10

महाराष्ट्राचा राज्य कीटक कोणता आहे?

प्रश्न 11

महाराष्ट्राचा राज्य चिन्ह काय आहे?

प्रश्न 12

महाराष्ट्राचा राज्य फळ कोणते आहे?

प्रश्न 13

महाराष्ट्राचा राज्य भाषा कोणती आहे?

प्रश्न 14

महाराष्ट्राचा राज्य नृत्य शैली कोणती आहे?

प्रश्न 15

महाराष्ट्राचा राज्य संगीत प्रकार कोणता आहे?

प्रश्न 16

महाराष्ट्राचा राज्य क्रीडा प्रकार कोणता आहे?

प्रश्न 17

महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता आहे?

प्रश्न 18

महाराष्ट्राचा राज्य चिन्ह कशावर आधारित आहे?

प्रश्न 19

महाराष्ट्राचा राज्य फळ कोणते आहे?

प्रश्न 20

महाराष्ट्राचा राज्य कॅलेंडर कोणता आहे?

भारताचे राष्ट्रीय प्रतीके आधारित टेस्ट

भारताचे राष्ट्रीय प्रतीके टेस्ट

भारताचे राष्ट्रीय प्रतीके टेस्ट

सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्तर निवडा. सबमिट करा → स्कोअर पहा.

प्रश्न 1

भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाइन केला?

प्रश्न 2

भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला गेला?

प्रश्न 3

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मध्यभागी कोणता चक्र आहे?

प्रश्न 4

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

प्रश्न 5

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

प्रश्न 6

भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे?

प्रश्न 7

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?

प्रश्न 8

भारताचा राष्ट्रीय फळ कोणते आहे?

प्रश्न 9

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

प्रश्न 10

भारताचा राष्ट्रीय नदी कोणती आहे?

प्रश्न 11

भारताचा राष्ट्रीय गीत कोणते आहे?

प्रश्न 12

भारताचा राष्ट्रीय संगीत कोणते आहे?

प्रश्न 13

भारताचा राष्ट्रीय चिन्ह (Emblem) कोणता आहे?

प्रश्न 14

भारताचा राष्ट्रीय चिन्ह कधी स्वीकारला गेला?

प्रश्न 15

भारताचा राष्ट्रीय रंग कोणता मानला जातो?

प्रश्न 16

भारताचा राष्ट्रीय कॅलेंडर कोणता आहे?

प्रश्न 17

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

प्रश्न 18

भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे?

प्रश्न 19

भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य कोणते आहे?

प्रश्न 20

भारताचा राष्ट्रीय पंचांग कोणता आहे?

भारतरत्न इंदिरा गांधी..

 


        *भारतरत्न इंदिरा गांधी*

  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)

     *जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*

            (मुघलसराई)

   *मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४*

        ( नवी दिल्ली, भारत)

          *कार्यकाळ*

जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४


              *राष्ट्रपती*

नीलम संजीव रेड्डी

झैल सिंग

मागील : चौधरी चरण सिंग

पुढील : राजीव गांधी


               *कार्यकाळ*

जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७


                *राष्ट्रपती*

सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद

मागील : गुलजारी लाल नंदा

पुढील : मोरारजी देसाई


*भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

मागील : पी.व्ही. नरसिंहराव

पुढील : राजीव गांधी


            *कार्यकाळ*

ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९

मागील : एम.सी. छगला

पुढील : दिनेश सिंह


*भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ*

जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१

मागील : मोरारजी देसाई

पुढील : यशवंतराव चव्हाण


राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 

                      कांग्रेस

पती : फिरोज गांधी

अपत्ये : राजीव गांधी आणि 

             संजय गांधी

निवास : १, सफदरजंग रोड, 

              नवी दिल्ली

धर्म : हिंदू

चिरविश्रांती : शक्तीस्थळ


इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.


लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.


इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.


१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.


💁🏻‍♀️ *बालपण*

           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.


इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण

१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.

 

👫 *फिरोज गांधींसोबत विवाह*

             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.


💠 *राजकारणातला प्रवास*


*भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद*

           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.


📺 *माहिती व नभोवाणी मंत्री*

                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.


पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.


👩‍🦰 *पंतप्रधान* ⚜️

                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.


जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.


💣 *१९७१ चे भारत पाक युद्घ*

                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.


📝 *इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक*

इंदर मल्होत्रा

उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)

कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)

डॉम मोराईस (मिसेस गांधी)

पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)

पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)

प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)

सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

 

📕 *इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके*

               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)

दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)


🔲 *टपालाचे तिकीट*

                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

                      

          

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

            *डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे*         *(क्रांती - हरीतक्रांती)*       *जन्म : 7 नोव्हेंबर 1883*                (वर्धा , महाराष्ट...