मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी..

                                                          

  *भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी*

          (भारताचे ११ वे पंतप्रधान)

   *जन्म : २५ डिसेंबर १९२४*

         (ग्वाल्हेर,  ब्रिटिश भारत)

   *मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८*

(एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष

व्यवसाय : राजकारणी, कवी

धर्म : हिंदू

              अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.               🔆  *शिक्षण*

अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.


🎍 *राजकीय प्रवासाची सुरूवात*

राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.


*जनसंघ*

भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.


या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.


🌷 *भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना*

जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.


तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.


⚜️ *पंतप्रधान पद*

पहिली खेप (मे १९९६)

१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.


🔆 *दुसरी खेप (मार्च १९९८)*                                                   १९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.


💥 *अणुचाचणी पोखरण २*

मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.


विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.


🤝 *लाहोर भेट आणि चर्चा*

१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता. यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले.


🇮🇳 *कारगील युद्ध*

कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.


उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.


*तिसरी खेप (ऑक्टोबर १९९९ - मे २००४)*

१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

           *महत्त्वाच्या नोंदी*

✈️ *भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण*

सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .


💥 *२००१ संसदेवरचा हल्ला*

२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.


📜 *पुरस्कार*

२०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.

१९९२, पद्मविभूषण पुरस्कार

१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय

१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार

१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

📰✍️ *साहित्यिक प्रवास*

वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले.                  ✍️ *त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.*


अमर आग है (कवितासग्रह)

अमर बलिदान

A Constructive Parliamentarian (संपादक - एन.एम. घटाटे)

कुछ लेख कुछ भाषण

कैदी कविराज की कुंडलिया(आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)

जनसंघ और मुसलमान

न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)

नयी चुनौती नया अवसर

New Dimensions of India's Foreign Policy (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)

Four Decades in Parliament (भाषणांचे ३ खंड)

बिन्दु-बिन्दु विचार

मृत्यू या हत्या

मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)

मेरी संसदीय यात्रा (चार खंड)

राजनीति की रपटीली राहें

Values, Vision & Verses of Vajpayee : India's Man of Destiny

लोकसभा मे अटलजी (भाषणांचा सग्रह)

शक्ति से शान्ति

संकल्प काल

संसद मे तीन दशक (speeches in Parliament - 1957-1992 - three volumes

Selected Poems

🪔 *निधन*

दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली.                                          📒 *प्रसिद्ध कविता*

अंतरद्वंद्व

अपने ही मन से कुछ बोलें

ऊॅंचाई

एक बरस बीत गया

क़दम मिला कर चलना होगा

कौरव कौन, कौन पांडव

क्षमा याचना

जीवन की ढलने लगी सॉंझ

झुक नहीं सकते

दो अनुभूतियॉं

पुनः चमकेगा दिनकर

मनाली मत जइयो

मैं न चुप हूॅं न गाता हूॅं

मौत से ठन गई

हरी हरी दूब पर

हिरोशिमा की पीड़ा

📜 *सन्मान*

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.

📚 *वाजपेयींवरील पुस्तके*

अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने)

Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक - किंगशुक नाग)

The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)

काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)

भारतरत्न अटलजी (डाॅ. शरद कुंटे)

हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी)


         

भारतरत्न मदनमोहन मालवीय..

 


    *भारतरत्न मदनमोहन मालवीय*

(उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य असलेले महामना) 

*जन्म : २५ डिसेंबर १८६१*

              (अलाहाबाद)

*मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६*

              (वाराणसी)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, हिंदू पुनरुत्थान

संघटना : बनारस हिंदू विद्यापीठ

पुरस्कार : भारतरत्न (२०१४)मरणोत्तर

धर्म : हिंदू

वडील : पंडित ब्रिजनाथ

आई : मूनादेवी

        पंडित मदन मोहन मालवीय यांना भारत सरकारचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले मालवीय अकरावे भारतीय आहेत.


मदनमोहन मालवीय

‘काँग्रेसच्या १८८६ मध्ये कोलकात्याला झालेल्या द्वितीय अधिवेशनाला २५ वर्षांचे मदन मोहन मालवीय यांनी जे भाषण केले, त्याने अध्यक्ष दादाभाई नवरोजी इतके प्रभावीत झाले की, ‘मालवीयजींच्या मुखातून साक्षात भारतमाता बोलत होती’, असे उद्गार त्यांनी काढले. मदनमोहन यांचे पिताश्री पं. ब्रजनाथ हे रसाळ कीर्तनकार होते. स्वतः मालवीयजींना संगीतात उत्तम गती होती.


*१. काशी हिंदु विश्वविद्यालय स्थापन करायचे ठरल्यावर गडगंज पैसा देणारी वकिली सोडून देणारे त्यागी वृत्तीचे महामना मदनमोहन मालवीय !*

पोलीस चौकी जाळली आणि २१ पोलिसांना जाळले म्हणून गांधींनी जे आंदोलन चौरीचौरा येथे मागे घेतले त्या अभियोगात १७० जणांना फाशी झाली. काँग्रेसचे नेते असलेले मदनमोहन मालवीयजींनी आंदोलकांची बाजू इतक्या समर्थपणे मांडली की न्यायमूर्तींनी उठून उभे राहून त्यांना अभिवादन केले आणि बहुतेक जणांची फाशी रहित केली. तथापी गडगंज पैसा देणारी वकिली काशी हिंदु विश्वविद्यालय स्थापन करायचे ठरल्यावर त्यांनी क्षणार्धात सोडून दिली. हिंदूंना त्यांच्या उर्जस्वल भूतकाळाचे साभिमान ज्ञान हवे; पण वर्तमान समस्यांवर मात करण्याइतकी प्रतिकार शक्ती सक्षम हवी, हा हेतू मनात ठेवून एका कुंभमेळ्यात त्यांनी विश्वविद्यालयाचा संकल्प सोडला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काशीच्या काँग्रेस अधिवेशनात १९०५ मध्ये तसा औपचारिक ठराव मांडला गेला. व्हाइसराय लॉर्ड हार्डिग्ज यांनी १९१६ मध्ये कोनशिला बसवितांना ‘आता शिक्षण प्रणालीत परिवर्तन निश्चित होणार या विश्वासाने सर्व उपस्थितांच्या मुखांवर प्रतिबिंबीत झालेला आनंद आपणाला जाणवत आहे’, असे उद्गार काढले होते.


*२. वसिष्ठ आणि गौतम या तपस्वी मुनींच्या परंपरेचा मान ठेवणारे विद्यार्थी घडवणारे बनारस हिंदु विश्वविद्यालय !*

‘अलीगड मुस्लीम विद्यापिठाप्रमाणे विघटनाचे विचार प्रसृत करणारे विद्यार्थी मदनमोहन मालवीयजींच्या काशी येथील हिंदु विश्वविद्यालयाने निर्माण केले नाहीत. व्हाइसराय लॉर्ड हार्डिग्ज यांनी या विश्वविद्यालयाच्या कोनशिला समारंभामध्ये वसिष्ठ आणि गौतम या तपस्वी मुनींच्या परंपरेचा उल्लेख केला होता. त्या परंपरेचा मान ठेवणारे विद्यार्थी येथून बाहेर पडले.


*३. हिंदु विश्वविद्यालयाच्या उभारणी करता अखंड झिजणारे ज्ञानतपस्वी मदनमोहन मालवीय !*

हिंदु विश्वविद्यालयाच्या कल्पनेचा प्रचार करण्यासाठी आणि गोहत्याबंदीच्या मागणीसाठी मदनमोहन मालवीयजींनी देशभर पायाला भिंगरी लागल्यासारखा प्रवास केला. बाहेर पडतांना ते त्या दिवसाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट ठरवीत आणि ते पूर्ण झाल्यावाचून अन्नग्रहण करीत नसत. खरे म्हणजे घराबाहेर पडल्यावर इतरांच्या हातचे पाणीही ते पित नसत. इतक्या कर्मठ निस्पृहपणाने त्यांनी इतका प्रचंड लोकसंग्रह आणि इतकी प्रचंड कामे कशी उभी केली, हे एक आश्चर्यच आहे.


*४. काँग्रेस पक्षात एकेकाळी मदनमोहन मोलवीय यांच्यासारखे हिंदूंसाठी झटणारे व्यक्तीत्त्व असणे, हे मोठे आश्चर्य !*

काँग्रेसचे नेते पंडित मदनमोहन मालवीय यांनी आयुष्यातले पहिले भाषण जे त्यांनी १८७७ मध्ये केले ते आणि १९४६ मध्ये केलेले शेवटचे भाषण गोरक्षणावर आहे. गाभण गायींना मारून आतल्या अर्भकांच्या कातड्यांचे जोडे घालण्याची हौस युरोपात प्रचलित आहे हे कळल्यावर त्यांनी चामड्याची पादत्राणे वापरणे बंद केले. जालियनवाला बाग हत्याकांडावर इंपिरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत त्यांनी सरकारचे वाभाडे काढणारे जे पाच तास भाषण केले, ते ब्रिटिश पार्लमेंटमधील एडमंड बर्कच्या भाषणाची आठवण करून देणारे होते, असे म्हटले जाते. रावळपिंडीला जाऊन ‘हिंदु धर्म केवळ मानवीय मूल्यांचा उद्घोष करतो, तो औषधालाही संकुचित नाही’, असे त्यांनी सांगितले. आपल्याला काशीला मरण येऊ देऊ नका आणि दहनही काशीत करू नका, कारण आपणास मुक्ती नको असून पुनर्जन्म घेऊन भारतमातेची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी पुरोहिताला बोलावून सांगितले होते. समग्र क्रांतीची दृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. हिंदूंची मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी उदंड संघर्ष केला. त्यांचे मन काठोकाठ करुणेने भरले होते आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यात कसलाही डाग त्यांनी उमटू दिला नाही. फाळणीच्या वेळी हिंदूवर जे अनन्वित अत्याचार झाले, त्या धक्क्याने त्यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षात एकेकाळी अशी माणसे सापडत असत.’

     

भारतरत्न चक्रवर्ती राजगोपालाचारी

               


                *भारतरत्न*

     *चक्रवर्ती राजगोपालाचारी*

    (प्रथम भारतीय गवर्नर जनरल)


    *जन्म : 10 दिसम्बर 1878*

(थोरापल्ली, कृष्णागिरी,तामिलनाडू)


   *मृत्यु : 25 दिसम्बर 1972* 

                (उम्र 94)

            (मद्रास, भारत)


राजनैतिक पार्टी : स्वतंत्र पार्टी 

                    (1959–1972)

अन्य राजनैतिक सहबद्धताएं : भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 

                      (1957 से पहले)

इंडियन नेशनल डेमोक्रेटिक कांग्रेस      

                     (1957–1959)

जीवन संगी : अलामेलु मंगम्मा  

                    (1897–1916)

विद्या अर्जन : सेंट्रल कॉलेज

             प्रेसीडेंसी कालिज, मद्रास

पेशा : वकील, लेखक, राजनेता


             चक्रवर्ती राजगोपालाचारी  राजाजी नाम से भी जाने जाते हैं। वे वकील, लेखक, राजनीतिज्ञ और दार्शनिक थे। वे स्वतन्त्र भारत के द्वितीय गवर्नर जनरल और प्रथम भारतीय गवर्नर जनरल थे। १० अप्रैल १९५२ से १३ अप्रैल १९५४ तक वे मद्रास प्रांत के मुख्यमंत्री रहे। वे दक्षिण भारत के कांग्रेस के प्रमुख नेता थे, किन्तु बाद में वे कांग्रेस के प्रखर विरोधी बन गए तथा स्वतंत्र पार्टी की स्थापना की। वे गांधीजी के समधी थे। (राजाजी की पुत्री लक्ष्मी का विवाह गांधीजी के सबसे छोटे पुत्र देवदास गांधी से हुआ था।) उन्होंने दक्षिण भारत में हिन्दी के प्रचार-प्रसार के लिए बहुत कार्य किया।


💁‍♂ *आरम्भिक जीवन*

                     उनका जन्म दक्षिण भारत के सलेम जिले में थोरापल्ली नामक गांव में हुआ था। राजाजी तत्कालीन सलेम जनपद के थोरापल्ली नामक एक छोटे से गांव में एक तमिल ब्राह्मण परिवार (श्री वैष्णव) में जन्मे थे। आजकल थोरापली कृष्णागिरि जनपद में है। उनकी आरम्भिक शिक्षा होसूर में हुई। कालेज की शिक्षा मद्रास (चेन्नई) एवं बंगलुरू में हुई।


✴ *मुख्यमंत्री*

                      सन 1937 में हुए काँसिलो के चुनावों में चक्रवर्ती के नेतृत्व में कांग्रेस ने मद्रास प्रांत में विजय प्राप्त की। उन्हें मद्रास का मुख्यमंत्री बनाया गया। 1939 में ब्रिटिश सरकार और कांग्रेस के बीच मतभेद के चलते कांग्रेस की सभी सरकारें भंग कर दी गयी थीं। चक्रवर्ती ने भी अपने पद से त्यागपत्र दे दिया। इसी समय दूसरे विश्व युद्ध का आरम्भ हुआ, कांग्रेस और चक्रवर्ती के बीच पुन: ठन गयी। इस बार वह गांधी जी के भी विरोध में खड़े थे। गांधी जी का विचार था कि ब्रिटिश सरकार को इस युद्ध में मात्र नैतिक समर्थन दिया जाए, वहीं राजा जी का कहना था कि भारत को पूर्ण स्वतंत्रता देने की शर्त पर ब्रिटिश सरकार को हर प्रकार का सहयोग दिया जाए। यह मतभेद इतने बढ़ गये कि राजा जी ने कांग्रेस की कार्यकारिणी की सदस्यता से त्यागपत्र दे दिया। इसके बाद 1942 में 'भारत छोड़ो' आन्दोलन प्रारम्भ हुआ, तब भी वह अन्य कांग्रेसी नेताओं के साथ गिरफ्तार होकर जेल नहीं गये। इस का अर्थ यह नहीं कि वह देश के स्वतंत्रता संग्राम या कांग्रेस से विमुख हो गये थे। अपने सिद्धांतों और कार्यशैली के अनुसार वह इन दोनों से निरंतर जुड़े रहे। उनकी राजनीति पर गहरी पकड़ थी। 1942 के इलाहाबाद कांग्रेस अधिवेशन में उन्होंने देश के विभाजन को स्पष्ट सहमति प्रदान की। यद्यपि अपने इस मत पर उन्हें आम जनता और कांग्रेस का बहुत विरोध सहना पड़ा, किंतु उन्होंने इसकी चिंता नहीं की। इतिहास गवाह है कि 1942 में उन्होंने देश के विभाजन को सभी के विरोध के बाद भी स्वीकार किया, सन 1947 में वही हुआ। यही कारण है कि कांग्रेस के सभी नेता उनकी दूरदर्शिता और बुद्धिमत्ता का लोहा मानते रहे। कांग्रेस से अलग होने पर भी यह अनुभव नहीं किया गया कि वह उससे अलग हैं।


✳ *राज्यपाल*

                        1946 में देश की अंतरिम सरकार बनी। उन्हें केन्द्र सरकार में उद्योग मंत्री बनाया गया। 1947 में देश के पूर्ण स्वतंत्र होने पर उन्हें बंगाल का राज्यपाल नियुक्त किया गया। इसके अगले ही वर्ष वह स्वतंत्र भारत के प्रथम 'गवर्नर जनरल' जैसे अति महत्त्वपूर्ण पद पर नियुक्त किए गये। सन 1950 में वे पुन: केन्द्रीय मंत्रिमंडल में ले लिए गये। इसी वर्ष सरदार वल्लभ भाई पटेल की मृत्यु होने पर वे केन्द्रीय गृह मंत्री बनाये गये। सन 1952 के आम चुनावों में वह लोकसभा सदस्य बने और मद्रास के मुख्यमंत्री निर्वाचित हुए। इसके कुछ वर्षों के बाद ही कांग्रेस की तत्कालीन नीतियों के विरोध में उन्होंने मुख्यमंत्री पद और कांग्रेस दोनों को ही छोड़ दिया और अपनी पृथक स्वतंत्र पार्टी की स्थापना की।


🎖 *सम्मान*

                      1954 में भारतीय राजनीति के चाणक्य कहे जाने वाले राजा जी को भारत रत्न से सम्मानित किया गया। भारत रत्न पाने वाले वे पहले व्यक्ति थे। वह विद्वान और अद्भुत लेखन प्रतिभा के धनी थे। जो गहराई और तीखापन उनके बुद्धिचातुर्य में था, वही उनकी लेखनी में भी था। वह तमिल और अंग्रेज़ी के बहुत अच्छे लेखक थे। 'गीता' और 'उपनिषदों' पर उनकी टीकाएं प्रसिद्ध हैं। इनके द्वारा रचित चक्रवर्ति तिरुमगन, जो गद्य में रामायण कथा है, के लिये उन्हें सन् १९५८ में साहित्य अकादमी पुरस्कार (तमिल) से सम्मानित किया गया। उनकी लिखी अनेक कहानियाँ उच्च स्तरीय थीं। 'स्वराज्य' नामक पत्र उनके लेख निरंतर प्रकाशित होते रहते थे। इसके अतिरिक्त नशाबंदी और स्वदेशी वस्तुओं विशेषकर खादी के प्रचार प्रसार में उनका योगदान महत्त्वपूर्ण माना जाता है।


⏳ *निधन*


अपनी वेशभूषा से भी भारतीयता के दर्शन कराने वाले इस महापुरुष का 28 दिसम्बर 1972 को निधन हो गया।


         

सरदार वल्लभ भाई पटेल..

                                               


                   *लौहपुरुष* 

      *सरदार वल्लभ भाई पटेल*

*(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)*


   *जन्म : 31 अक्टोबर 1875*

(नडियाद, बंबई प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत)

     *मृत्यु :15 डिसेंबर 1950* 

                   (वय 75)

वडिल : झावेरभाई पटेल

आई : लाडबाई

पत्नी : झावेरबा

मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल 

शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड

पुस्तक : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल  के संग्रहित कार्य, 15 खंड

स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी     *भारताचे उप-प्रधानमंत्री*

                *पद बहाल*

15 आॕगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : मोरारजी देसाई

            *गृह मंत्रालय*

             *पद बहाल*

15 अॕॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950

प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु

पूर्वा धिकारी : पद सृजन

उत्तरा धिकारी : चक्रवर्ती  

                       राजगोपालाचारी

🔸 *वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन*

वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विðलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.


👫🏻 *वल्लभभाई पटेल यांचा विवाह*

            त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.


♦️ *पत्नीच्या मृत्युची बातमी ऐकुन देखील कोर्टात करत राहीले कामकाज*

        वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.

                  ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.


💁🏻‍♂️ *वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात*

       आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.

               घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणा-या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.

            1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.

        त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.


🔆 *वल्लभभाई गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले*

          पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.

🔸 *वल्लभभाई पटेलांची राजकिय कारकिर्द*

⚜️ *स्वातंत्र्य संग्रामात सरदार वल्लभभाई पटेलांची भुमिका*

                  भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.

                    सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


🔮 *शेतकरी संघर्षात वल्लभभाईंची महत्वाची भुमिका*

                    महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.

                  परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.

                   या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.                               ♦️ *महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासमवेत सर्व आंदोलनांना सरदार वल्लभ भाई पटेलांनी दिले समर्थन*   

वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली.

                  याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.


♦️ *अशी मिळाली सरदार ही पदवी*

                     आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणा-या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.

               या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.


🌀 *काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास*

                     दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.

             1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.

           या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.


♨️ *स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका*

                स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.

              त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.

          वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.


🔰 *सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन*

                   फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.

               सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.

                  या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.


🪔 *निधन* 

                    1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.


📜 *सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान*

       1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.


या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की


सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ

सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत

सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात

सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली

सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद

स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद

सरदार सरोवर बांध, गुजरात

सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद

🎯 *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप*

▪️1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले

▪️1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.           ▪️ 1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले.

▪️1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.

▪️ 1919 साली रौलेट अॅक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला

▪️ 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात वल्लभभाईंनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पीत केले. प्रत्येक महिन्याला हजारो कमवुन देणारी वकिली देखील त्यांनी देशाकरता सोडुन दिली.

▪️ 1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.

▪️1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.

▪️1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.

▪️1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.

▪️1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.

▪️1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.

▪️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली.                 ▪️वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.                                           🎞️📽️ *सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट*

                    1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.


🗽 *स्टैच्यू ऑफ यूनिटी*

       लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.

                    अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.


         

सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे

                                     


  *सहकार महर्षि स्व. तात्यासाहेब कोरे*

   (सहकार महर्षितथा स्वातंत्र्य सैनिक)

             *जन्म : १७ आॕक्टोबर १९१४*

                

             *मृत्यू : १३ डिसेंबर १९९४*                                      

वारणा नगरी म्हणजे एका सामान्य माणसाचं पाहिलेलं स्वप्न लोक म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नाही, परंतु याच उत्तम उदाहरण म्हणजे वारणा नगरी एवढी मोठी वारणानगरी वसवणे म्हणजे चेष्टा नव्हे आज वारणा नगरीचे नाव पंचक्रोशीत गाजत आहे. त्याचे विधाते म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. तात्यासाहेब कोरे यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९१४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आण्णासाहेब व आईचे नाव भागीरथी असे होते, प्लेगच्या साथीमुळे तात्यासाहेबांच्या आई त्यांच्या लहानपणीच वारल्या कृष्णा काकूनी त्यांचा सांभाळ केला. १९२१ साली त्यांना कोडोली प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. संख्या, लेखन, आणि अंकगणित हे तात्यासाहेबांच्या आवडीचे विषय तात्यासाहेब लहानपणापासूनच मेहनत व अथक परिश्रम करत होते. जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी विद्यानगरी उभारली त्यांचे गुरुवर्य रामचंद्र राजमाने यांनी त्यांना अनुशासन आणि आदर्श वर्तन याच्या सोबत खेळ आणि शिक्षेची जीवन मूल्य शिकवली गुरुजी श्रीधरपंत कुलकर्णी यांनी त्यांना संस्कृत इंग्रजी मराठीचे ज्ञान दिलं गुरु जणांकडून राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, सुख, त्याग याची समर्पकता तात्यासाहेबांना समजली. १९२९ पासून तात्यासाहेबांचे शिक्षण सांगलीत झाले. तिथे त्यांची मैत्री केशवराव पाटील कामेरी, डॉक्टर मगदूम आणि बी. ए. चौगुले यांच्याशी झाली परंतु म्हणतात ना कधीकधी जबाबदारी आपली परीक्षा घेते तसं काहीच तात्यासाहेबांच झालं, जबाबदारीमुळे त्यांना शिक्षण सोडून परंपरागत तराजू घेऊन घरचा व्यवसाय सांभाळायला लागला.

                घरची जबाबदारी खांद्यावर असतानाच विसाव्या वर्षी म्हणजेच २२ डिसेंबर १९३४  मध्ये बेडग गावच्या वीर संगाप्पा आवटी यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी तात्यासाहेब यांचा विवाह झाला. तात्यासाहेबांच्या म्हणण्यानुसार सावित्रीबाई अत्यंत समजूतदार सुसंस्कृत मनमिळावू होत्या, ते सावित्रीबाईंना प्रोफेसर असेही म्हणत. सावित्रीबाई वर्षातून दोन ते तीन मुलं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत या कारणामुळे त्यांना सगळे आक्का म्हणत असत. तात्यासाहेबांनी सन १९४२ साली  भारत छोडो आणि चले जाओ आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. इन्कलाब जिंदाबाद करेंगे या मरेंगे परंतु चाळीस करोड लोक नाही दबणार अशा घोषणा सुद्धा दिल्या. वारणा नदीकाठचा डाग मळा तात्यासाहेबांनी भूमिगत कार्यकर्ते व प्रतिसरकार चालवण्यासाठी दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत पुढे तात्यासाहेबांनी गांधीजी व साने गुरुजी यांच्या तत्वावर चालण्याचा निर्णय घेतला.

                सन १९५१ मध्ये गुळाच्या व्यवसायात होणारा तोटा चिंताजनक होता यादरम्यान शेतकरी सहकारी संघ यांचे तात्यासाहेब मोहिते यांचा सहकारी साखर कारखाना तात्यासाहेबांनी पाहिला त्याची माहिती घेतली. त्यांना समजलं परंपरागत शेतीपेक्षा शास्त्रीय व आधुनिक यांत्रिक शेती करणे गरजेचे आहे. बाजारात गुळा पेक्षा  साखरेला जास्त किंमत आहे. सन १९५२ मध्ये तात्यासाहेबांनी गावागावात घराघरात जाऊन कारखान्यासाठी सभासद तयार केले. या कार्यात लोकांचा चांगला सहभाग त्यांना मिळाला, आणि सहकारी तत्त्वावर तात्यासाहेबांनी कारखाना सुरू केला. दिनांक २६ ऑगस्ट १९५४ साली वारणानगर ची निर्मिती झाली. अनेक संकटांना सामोरे जात परदेशातून तात्यासाहेबांनी यंत्रसामग्री मिळवली. कारखान्याचा पहिला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ १६ फेब्रुवारी १९५९ ला सावित्री अक्कांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा होता. हा तात्यासाहेबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. या दरम्यान मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या हस्ते यंत्रसामग्रीची पूजा केली. आणि वारणा सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ झाला.

               तात्यासाहेबांनी १९६४ मध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. आणि २० जून १९६४  च्या दिवशी प्राचार्य भा.शं. भणगे यांच्या हस्ते शारदा पूजन करून वारणा महाविद्यालयाचा शुभारंभ केला. १२८  विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांच्यासमवेत या महाविद्यालयालाचा शुभारंभ झाला. यावरून तात्यासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. आज वारणेच्या मुलांना जवळ शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे क्लर्क पासून कलेक्टर पर्यंत मुलांनी झेप घेतली, तात्यासाहेबांनी सर्वप्रथम उच्च शिक्षणाची सोय केली. आज सुद्धा वारणामहाविद्यालय तात्यासाहेबांच्या तत्त्वावर कार्य करत आहे. वारणा साखर कारखाना व महाविद्यालयाच्या स्थापने नंतर रोजगार करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून १९६९ मध्ये तात्यासाहेबांनी वारणा विद्यामंदिर ची स्थापना केली. कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी व गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावेत, म्हणून तात्यांनी वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. घरातल्या महिलांना सुद्धा काम मिळावं म्हणून जनावरांपासून मिळणारे दूध विकून त्यांना चार पैसे मिळावे. या हेतूने तात्यासाहेबांनी २० जुलै १९६८ रोजी श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि., ची स्थापना केली.


         सावित्री आक्कांच्या म्हणण्यानुसार येथील महिलांना सुद्धा घरबसल्या काम मिळावे, म्हणून वारणा भगिनी मंडळ व महिला गृह उद्योग लिज्जत पापड केंद्र १९७४ ला सुरू केले. याच हेतूने लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून १९७६ मध्ये वारणा ग्राहक मंडळ म्हणजेच वारणा बजार ची स्थापना केली. १९८३ मध्ये आय.टी.आय कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज तर १९८४ मध्ये ट्रेनिंग आणि प्रोडक्शन सेंटर सोबतच कुकुट पालन केंद्र व महात्मा गांधी हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी साखर कारखान्या सोबतच अन्य मुख्य लघु तथा सहायक उद्योग सुरू केले, तात्यासाहेबांचे स्वप्न होतं की आपल्या माणसांनी इथेच मेहनत करावी, इथेच कमवा व इथेच खर्चावा अर्थात इथे जो पैसा येईल तो इथेच राहावा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे जावे लागू नये. रोजगारासाठी भटकंती होऊ नये, व सर्वांचे जीवन सुखकर व सोयीस्कर व्हावे या विचाराने तात्यासाहेबांनी या संस्थांची स्थापना केली.

                आणि अखेर १३ डिसेंबर १९९४ रोजी या महामानवाची प्राणज्योत मावळली. आजही १३ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन मोठ्या समारंभाने साजरा केला जातो. विद्यमान आमदार आणि तात्यांसाहेबांचे नातू डॉ. विनयरावजी कोरे सावकर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कृषिप्रदर्शन या आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात आजही वारणा समूहाशी संबंधित शंभर हून अधिक गावातून लोक पहाटेचा अंधार चिरत हातात मशाली घेऊन तात्यांच्या स्मृतींचा जागर करत येतात, म्हणतात तात्यासाहेब कोरे अमर रहे! अमर रहे! अमर रहे! तात्यासाहेब कोरे अमर रहे!        

         

भारतरत्न प्रणव मुखर्जी..

                                           


          *भारतरत्न  प्रणव मुखर्जी*

           (भारताचे १३वे राष्ट्रपती)

        *जन्म : ११ डिसेंबर १९३५*  (वय : ८५)

(वीरभूम जिल्हा, ब्रिटीश भारत) (आजचा पश्चिम बंगाल)

       *मृत्यू : ३१ ऑगस्ट २०२०*

                (नवी दिल्ली)

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९८६ पूर्वी, १९८९ - चालू), राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस (१९८६ - १९८९)

मागील : इतर राजकीय पक्ष

संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४ - चालू)

*भारताचे १३ वे राष्ट्रपती कार्यकाळ*

२५ जुलै २०१२ – २५ जुलै २०१७

पंतप्रधान - मनमोहन सिंग

मागील - प्रतिभा पाटील

पुढील - रामनाथ कोविंद

*भारताचे अर्थमंत्री कार्यकाळ*

२४ जानेवारी २००९ – २६ जून २०१२

पंतप्रधान - मनमोहन सिंग

मागील - मनमोहन सिंग

पुढील - मनमोहन सिंग

           *कार्यकाळ*

१५ जानेवारी १९८२ – ३१ डिसेंबर १९८४

पंतप्रधान - इंदिरा गांधी, राजीव गांधी

मागील - रामस्वामी वेंकटरमण

पुढील - विश्वनाथ प्रताप सिंग

*भारताचे परराष्ट्रमंत्री कार्यकाळ*

१० फेब्रुवारी १९९५ – १६ मे १९९६

पंतप्रधान - नरसिंह राव

मागील - दिनेश सिंग

पुढील - अटल बिहारी वाजपेयी

*भारताचे संरक्षणमंत्री कार्यकाळ*

२२ मे २००४ – २६ ऑक्टोबर २००६

पंतप्रधान - मनमोहन सिंग

मागील - जॉर्ज फर्नान्डिस

पुढील - ए.के. ॲंटनी

             प्रणव मुखर्जी हे  भारतीय प्रजासत्ताकाचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.  भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.                                            💁🏻‍♂️ *जन्म*

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील वीरभूम जिल्ह्यातील मीराती गावामध्ये बंगाली कुळाच्या परिवारात झाला. ११ डिसेंबर १९३५ अशी प्रणव मुखर्जी यांची जन्मतारीख आहे. प्रणव मुखर्जी यांच्या घरामध्ये राजनैतिक माहोल होता. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी देखील राजकारणात होते. ते बंगालच्या विधानसभेत एक सदस्य म्हणून कार्यरत होते. ते ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते त्यासाठी त्यांना दहा वर्षाची सजा देखील झाली होती.

             त्यांचे वडील १९२० मध्ये काँग्रेस मध्ये कार्यरत होते. त्यांची आई देखील एका गृहिणी सोबतच एक भारतीय स्वतंत्रता सैनिक होत्या. त्यामुळे प्रणव यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू पाजले गेले. आई-वडिलांच राजकारणात असल्यामुळे कदाचित प्रणव मुखर्जी यांना देखील राजकारणात जाण्याची आवड निर्माण झाली असावी.


📙 *शिक्षण*

         प्रणव मुखर्जी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याजवळील स्थानिक विद्यालयातूनच पार पडले. परंतु पुढचं शिक्षण प्रणव जी यांनी वीरभूमी येथील सुरी महाविद्यालय कॉलेज येथून पूर्ण केलं. त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र मध्ये उच्च पदवी देखील मिळवली. प्रणव मुखर्जी यांनी वकिलीचा अभ्यास अध्ययन करण्यासाठी कोलकत्ता इथे प्रवेश केला. त्याच्या पुढचं शिक्षण देखील त्यांनी कोलकाता युनिव्हर्सिटी मधूनच पूर्ण केलं.


💁🏻‍♂️ *वैयक्तिक आयुष्य*

             प्रणव मुखर्जी यांचा जन्म एका राजकीय घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आई-वडील त्यांना राजकारणाचे धडे द्यायचे त्यामुळे लहानपणापासूनच मुखर्जी यांच्या मनामध्ये राजकारणाविषयी आवड निर्माण झाली असावी. राजकारणात जाण्यासाठी गरजेचे असलेले शिक्षण देखील प्रणव मुखर्जी यांनी घेतलं पुढे त्यांनी वकील आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून काम करायचे.

                     त्यांची सुरुवात एक प्राध्यापक म्हणून झाली आणि पुढे जाऊन ते पत्रकार क्षेत्रात आले. प्रणव मुखर्जी यांना मानद डिलीट ही पदवी देखील मिळाली आहे. राजकारणात येण्याआधी प्रणव मुखर्जी पोस्ट अँड टेलिग्राफ या ऑफिस मध्ये एक क्लर्क च्या पदवी वर होते. १९६३ मध्ये विद्यानगर कॉलेजमध्ये ते राजनीती-शास्त्राचे प्रोफेसर बनून मुलांची शिकवणी घ्यायचे.

                 इतकेच नव्हे तर त्यांनी बांगला प्रकाशन संस्थान देशर डाक या ठिकाणीही काम केले आहे. २१ जुलै १९५७ मध्ये प्रणव मुखर्जी २२ वर्षांचे असताना त्यांचा विवाह सोहळा शुभ्र मुखर्जींशी पार पडला. या दोघांना दोन मुले आणि एक मुलगी देखील झाली.


🔰 *राजकीय आयुष्य*

         प्रणव मुखर्जी यांचे राजकीय आयुष्य १९६९ मधे सुरू झालं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे तिकीट मिळवून राज्यसभेचे सदस्य बनले. त्यांनी खूप मेहनत करून चार वेळा हे पद मिळवलं. त्यांची कामगिरी बघून इंदिरा गांधींच्या डोळ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढत गेला. १९७३ मध्ये प्रणव जी औद्योगिक विकासामध्ये उपमंत्री होते.

                  पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी उप मंत्री बनून नौकावाहन आणि परिवहन ही दोन खाती सांभाळली. १९७४ मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत ते अर्थ राज्यमंत्री होते. १९७५ – १९७७ या काळामध्ये झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रणव मुखर्जी यांच्या वरती काही आरोप लावण्यात आले त्यावरून वादविवाद चालू होते.


परंतु इंदिरा गांधींचे प्रणव मुखर्जी यांच्याशी संबंध चांगले असल्यामुळे इंदिरा गांधी यांची यांची सत्ता आल्यावर प्रणव मुखर्जी या सगळ्या वादातून अगदी सुखरूपपणे बाहेर पडले. इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होत्या त्यावेळी सन १९८२ – १९८४ मध्ये प्रणव मुखर्जी वित्त मंत्री होते. १९७५-१९७७ या दोन वर्षांच्या काळामध्ये ते महसूल आणि बँकिंग मंत्री देखील होते.


१९८०-१९८२ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले.‌ इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्यासोबत काही मतभेद झाले त्यानंतर प्रणव मुखर्जी हे वेगळे झाले. १९८५ मध्ये प्रणव मुखर्जी पश्चिम बंगाल काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदावर होते. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पी व्ही नरसिम्हा राव यांची खूप साथ प्रणव मुखर्जी यांना मिळाली.


            पी व्ही नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्य काळामध्ये त्यांनी प्रणव मुखर्जी यांना योजना आयोग प्रमुख बनवलं होतं थोड्याच दिवसांनी त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विदेश मंत्रालय देखील सांभाळायला दिलं. १९७९ मध्ये प्रणव मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते होते. १९८० मध्ये राज्यसभा सभागृहनेते.


१९८६ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९९५-१९९६ मध्ये त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद आलं.१९८९-१९९० पश्चिम बंगालमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी होते.२००१-२०१० पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष होते. आणि २०१२-२०१७ आपल्या भारताचे १३ वे‌ राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते.


⚜️ *प्रणब मुखर्जी कधी पासून राष्ट्रपति आहेत*

प्रणव मुखर्जी यांच्या सारख थोर व्यक्तिमत्व भारताचे राष्ट्रपती होते ही गोष्ट खूपच गर्व वाटावी अशी आहे. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये फार चढ आणि उतार मिळाले त्यांनी त्यांच्या आयुष्यातील चाळीस वर्ष भारतासाठी एक राजकीय नेता म्हणून अर्पण केली. आणि त्याच प्रमाणे देशात विकास देखील घडवून आणला.


प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती बनण्याचा प्रवास २५ जुलै २०१२ पासून ते २५ जुलै २०१७ पर्यंतचा होता. प्रणव मुखर्जी यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून एक एक गोष्ट अनुभवली आहे त्यामुळे त्यांचा अनुभव खूपच दांडगा आहे. एक सामान्य माणूस ते राष्ट्रपती असा प्रणव मुखर्जी यांचा प्रवास होता.


प्रणब मुखर्जीचा भारत रत्न

प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे आज पर्यंत अनेक अवॉर्ड मिळाले. त्यातील दोन असे मुख्य अवॉर्ड जे खूप कमी लोकांना मिळतात ते म्हणजेच “भारतरत्न” आणि पद्म भूषण अवॉर्ड. भारत रत्न हा अवॉर्ड २०१९ मध्ये प्रणव मुखर्जी यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांना “पद्मश्री” हा पुरस्कार देखील मिळाला.

            २०१० मध्ये प्रणव मुखर्जी यांना त्यांनी वित्तमंत्री हे पद अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले त्यामुळे त्यांना “फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर फॉर एशिया” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रणव यांनी फक्त भारतातच नाही तर विदेशामध्ये देखील त्यांची ख्याती पसरवली. बांगलादेशातील सरकारनेदेखील प्रणव मुखर्जी यांना बांगलादेशात सर्वोच्च असणारा “बांगलादेश लिब्रेशन वॉर ओनर” हा पुरस्कार देऊन प्रणव मुखर्जी यांचा सन्मान केला.


♦️ *द टर्बुलेंट इयर्स*

1980 -1996 प्रणब मुखर्जी: प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजकीय सफर एका पुस्तकांमध्ये उतरवून काढला. या पुस्तकाला त्यांनी द टर्बुलेंट इयर्स: 1980 -1996‌ असे नाव दिले. या पुस्तकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत घडलेल्या खूप काही गोष्टींचा खुलासा केला. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी असलेले संबंध यांच्यावर देखील लेखन केलं आहे.


                 प्रणव मुखर्जी यांनी या पुस्तकामध्ये त्यांच्यात आणि राजीव गांधी यांच्यामध्ये झालेला गैरसमज देखील स्पष्ट करून दाखवला आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार झाला होता त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि राजीव गांधी हे एका रॅलीचे नेतृत्व करत होते. तेव्हा राजीव गांधी यांना इंदिरा गांधी यांच्या हत्येच बद्दल कळालं तेव्हा ते लगेच दिल्लीला रवाना झाले.


त्यानंतर सगळ्यांनी राजीव गांधी यांना पीएम या पदावर बसण्यासाठी सांगितलं त्यावेळी राजीव गांधींनी आधी प्रणव मुखर्जी यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं? मी हे पद सांभाळू शकेल का? त्या वेळी प्रणव मुखर्जी म्हणाले की हो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण काही लोकांनी प्रणव मुखर्जी यांच्या काही गोष्टी राजीव गांधी यांच्यासमोर अशाप्रकारे दर्शवल्या की राजीव गांधी यांना वाटला प्रणव मुखर्जी यांना त्यांचे नेतृत्व पसंत नाही.


त्यावरून काही गैरसमज निर्माण झाले आणि प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडला. परंतु दोन वर्षांनी प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचा आणि राजीव गांधी यांच्या मधील वाद मिटले होते. गैरसमजुत दूर झाली होती. या पुस्तकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी असेच त्यांच्याबद्दल होणाऱ्या अफवा तसेच काही तथ्य देखील सांगितले आहेत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर प्रणव मुखर्जी यांना पीएम बनायचं होतं ह्या अफवेवर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे.


🪔 *मृत्यू*

            प्रणव मुखर्जी यांची तब्येत काही दिवस झाले बिघडली होती. दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. प्रणव मुखर्जी यांच्यावर सर्जरी देखील झाली होती. त्यासोबतच कोरोना ने देखील त्यांच्या शरीरात शिरकाव केला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आणि शेवटी ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी त्यांचं निधन झालं.


         

मुंबई उच्च न्यायालय एकूण पदे : 2331

 

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, चालक यासह विविध पदांसाठी 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली. ही भरती मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणारय.

एकूण पदे : 2331

खंडपीठे : मुंबई, नागपूर, औरंगाबाद

अर्ज पद्धत : Online

अधिकृत वेबसाइट : bombayhighcourt.nic.in

अर्ज सुरू : 15 डिसेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2026

अर्ज शुल्क : सर्व वर्गांसाठी ₹1000

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत 

लघुलेखक (हायर)


जागा : 19


आवश्यक पात्रता:


पदवीधर


शॉर्टहँड 100 WPM


इंग्रजी टायपिंग 40 WPM 


लघुलेखक (लोअर)


जागा : 56


पात्रता:


पदवीधर


शॉर्टहँड 80 WPM


इंग्रजी टायपिंग 40 WPM



3) लिपिक (Clerk)

जागा : 1332

पात्रता:

पदवीधर

GCC-TBC / ITI (इंग्रजी टायपिंग 40 WPM)

MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र

4) वाहनचालक (Driver)

जागा : 37

पात्रता:

किमान 10वी उत्तीर्ण

LMV वाहन परवाना

3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव 

शिपाई / हमाल / फरश


जागा : 887


पात्रता:


किमान 7वी उत्तीर्ण


वयोमर्यादा


सामान्य उमेदवार : 18 ते 38 वर्षे


मागासवर्गीय उमेदवार : 5 वर्षे शिथिलता


प्रफुल्लचंद चाकी...

            

           *प्रफुल्लचंद चाकी* 
          ( भारतीय क्रांतिकारी )

       *जन्म : 10 दिसंबर 1888*
                (बंगाल)
       *मृत्यु : 1 मई 1908*
              (कलकत्ता)
नागरिकता : भारतीय
धर्म : हिन्दू
आंदोलन : भारतीय स्वतंत्रता संग्राम
विशेष योगदान : देश के लिए अपने प्राणों की आहुति दे दी थी।
अन्य जानकारी : प्रफुल्लचंद चाकी ने आंदोलन में आगे बढ़कर भाग लिया। कक्षा 9 के छात्र प्रफुल्ल आंदोलन में भाग लेने के कारण स्कूल से निकाल दिए गए।
                       प्रफुल्लचंद चाकी  का नाम भारतीय स्वतंत्रता संग्राम के इतिहास में अत्यंत सम्मान के साथ लिया जाता है। इन्होंने देश के लिए अपने प्राणों की आहुति दे दी थी।
💁🏻‍♂️ *परिचय*
             क्रांतिकारी प्रफुल्ल चाकी का जन्म 10 दिसंबर, 1888 ई. को उत्तरी बंगाल के एक गांव में हुआ था। दो वर्ष के थे तभी उनके पिता का देहांत हो गया। मां ने बड़ी कठिनाई से प्रफुल्ल का पालन पोषण किया। विद्यार्थी जीवन में प्रफुल्ल का स्वामी महेश्वरानंद द्वारा स्थापित गुप्त क्रांतिकारी संगठन से परिचय हुआ। उन्होंने स्वामी विवेकानंद के साहित्य का और क्रांतिकारियों के विचारों का अध्ययन किया। इससे उनके अंदर देश को स्वतंत्र करने की भावना पुष्ट हो गई। इसी बीच बंगाल का विभाजन हुआ जिसके विरोध में लोग उठ खड़े हुए। विद्यार्थियों ने भी इस आंदोलन में आगे बढ़कर भाग लिया। कक्षा 9 के छात्र प्रफुल्ल आंदोलन में भाग लेने के कारण स्कूल से निकाल दिए गए। इसके बाद ही उनका संपर्क क्रांतिकारियों की 'युगांतर' पार्टी से हो गया।
💣💥 *मुजफ्फरपुर काण्ड*
                    उन दिनों कोलकाता का चीफ प्रेसिडेंसी मजिस्ट्रेट किंग्सफोर्ड राजनीतिक कार्यकर्त्ताओं को अपमानित और दंडित करने के लिए बहुत बदनाम था। क्रांतिकारियों ने उसे समाप्त करने का काम प्रफुल्ल चाकी और खुदीराम बोस को सौंपा। सरकार ने किंग्सफोर्ड के प्रति लोगों के आक्रोश को भांपकर उसकी सुरक्षा की दृष्टि से उसे सेशन जज बनाकर मुजफ्फरपुर भेज दिया। पर दोनों क्रांतिकारी भी उसके पीछे-पीछे पहुँच गए। किंग्सफोर्ड की गतिविधियों का अध्ययन करने के बाद उन्होंने 30 अप्रैल, 1908 को यूरोपियन क्लब से बाहर निकलते ही किंग्सफोर्ड की बग्घी पर बम फेंक दिया। किन्तु दुर्भाग्य से उस समान आकार-प्रकार की बग्घी में दो यूरोपियन महिलाएँ बैठी थीं जो कि पिंग्ले कैनेडी नामक एडवोकेट की पत्नी और बेटी थी, वे मारी गईं। क्रांतिकारी किंग्सफोर्ड को मारने में सफलता समझ कर वे घटना स्थल से भाग निकले।

🔫🪔 *बलिदान*
                   प्रफुल्ल ने समस्तीपुर पहुँच कर कपड़े बदले और टिकट ख़रीद कर ट्रेन में बैठ गए। दुर्भाग्यवश उसी डिब्बे में पुलिस सब इंस्पेक्टर नंदलाल बनर्जी बैठा था। बम कांड की सूचना चारों ओर फैल चुकी थी। इंस्पेक्टर को प्रफुल्ल पर कुछ संदेह हुआ। उसने चुपचाप अगले स्टेशन पर सूचना भेजकर चाकी को गिरफ्तार करने का प्रबंध कर लिया। पर स्टेशन आते ही ज्यों ही प्रफुल्ल को गिरफ्तार करना चाहा वे बच निकलने के लिए दौड़ पड़े। पर जब देखा कि वे चारों ओर से घिर गए हैं तो उन्होंने अपनी रिवाल्वर से अपने ऊपर स्वयं को फायर करके मोकामा के पास प्राणाहुति दे दी। यह 1 मई, 1908 की घटना है।
                      कालीचरण घोष ने अपने प्रसिद्ध ग्रंथ 'रोल ऑफ आनर' में प्रफुल्ल कुमार चाकी का विवरण अन्य प्रकार से दिया है। उनके अनुसार प्रफुल्ल ने खुदीराम बोस के साथ किंग्सफोर्ड से बदला लेते समय अपना नाम दिनेश चंद्र राय रखा था। घटना के बाद जब उन्होंने अपने हाथों अपने प्राण ले लिए तो उनकी पहचान नहीं हो सकी। इसलिए अधिकारियों ने उनका सिर धड़ से काट कर स्पिरिट में रखा और उसे लेकर पहचान के लिए कोलकाता ले गए। वहाँ पता चली कि यह दिनेश चंद्र राय और कोई नहीं, रंगपुर का प्रसिद्ध क्रांतिकारी प्रफुल्ल कुमार चाकी था।
                        
         

खुदीराम बोस..

 

  

         *बाल शहीद खुदीराम बोस*

   (भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)


     *जन्म : ३ दिसंबर १८८९*

   (बहुवैनी, मिदनापूर, प. बंगाल)


    *फांशी : ११ अगस्त १९०८*

            (मुजफ्फरपूर जेल)


             युवा क्रान्तिकारी खुदीराम बोस  भारतीय स्वाधीनता के लिये मात्र १९ साल की उम्र में भारतवर्ष की आजादी के लिये फाँसी पर चढ़ गये। कुछ इतिहासकारों की यह धारणा है कि वे अपने देश के लिये फाँसी पर चढ़ने वाले सबसे कम उम्र के ज्वलन्त तथा युवा क्रान्तिकारी देशभक्त थे। लेकिन एक सच्चाई यह भी है कि खुदीराम से पूर्व १७ जनवरी १८७२ को ६८ कूकाओं के सार्वजनिक नरसंहार के समय १३ वर्ष का एक बालक भी शहीद हुआ था। उपलब्ध तथ्यानुसार उस बालक को, जिसका नम्बर ५०वाँ था, जैसे ही तोप के सामने लाया गया, उसने लुधियाना के तत्कालीन डिप्टी कमिश्नर कावन की दाढी कसकर पकड ली और तब तक नहीं छोडी जब तक उसके दोनों हाथ तलवार से काट नहीं दिये गये बाद में उसे उसी तलवार से मौत के घाट उतार दिया गया था। 


💁‍♂ *जन्म व प्रारम्भिक जीवन*

                   खुदीराम का जन्म ३ दिसंबर १८८९ को पश्चिम बंगाल के मिदनापुर जिले के बहुवैनी नामक गाँव में बाबू त्रैलोक्यनाथ बोस के यहाँ हुआ था। उनकी माता का नाम लक्ष्मीप्रिया देवी था। बालक खुदीराम के मन में देश को आजाद कराने की ऐसी लगन लगी कि नौवीं कक्षा के बाद ही पढ़ाई छोड़ दी और स्वदेशी आन्दोलन में कूद पड़े। छात्र जीवन से ही ऐसी लगन मन में लिये इस नौजवान ने हिन्दुस्तान पर अत्याचारी सत्ता चलाने वाले ब्रिटिश साम्राज्य को ध्वस्त करने के संकल्प में अलौकिक धैर्य का परिचय देते हुए पहला बम फेंका और मात्र १९ वें वर्ष में हाथ में भगवद गीता लेकर हँसते - हँसते फाँसी के फन्दे पर चढकर इतिहास रच दिया।


♻ *क्रान्ति के क्षेत्र में*

                    स्कूल छोड़ने के बाद खुदीराम रिवोल्यूशनरी पार्टी के सदस्य बने और वन्दे मातरम् पैफलेट वितरित करने में महत्वपूर्ण भूमिका निभायी। १९०५ में बंगाल के विभाजन (बंग-भंग) के विरोध में चलाये गये आन्दोलन में उन्होंने भी बढ़-चढ़कर भाग लिया।


⚛ *राजद्रोह के आरोप से मुक्ति*

       फरवरी १९०६ में मिदनापुर में एक औद्योगिक तथा कृषि प्रदर्शनी लगी हुई थी। प्रदर्शनी देखने के लिये आसपास के प्रान्तों से सैंकडों लोग आने लगे। बंगाल के एक क्रांतिकारी सत्येंद्रनाथ द्वारा लिखे ‘सोनार बांगला’ नामक ज्वलंत पत्रक की प्रतियाँ खुदीरामने इस प्रदर्शनी में बाँटी। एक पुलिस वाला उन्हें पकडने के लिये भागा। खुदीराम ने इस सिपाही के मुँह पर घूँसा मारा और शेष पत्रक बगल में दबाकर भाग गये। इस प्रकरण में राजद्रोह के आरोप में सरकार ने उन पर अभियोग चलाया परन्तु गवाही न मिलने से खुदीराम निर्दोष छूट गये।

                    इतिहासवेत्ता मालती मलिक के अनुसार २८ फरवरी १९०६ को खुदीराम बोस गिरफ्तार कर लिये गये लेकिन वह कैद से भाग निकले। लगभग दो महीने बाद अप्रैल में वह फिर से पकड़े गये। १६ मई १९०६ को उन्हें रिहा कर दिया गया।

                   ६ दिसंबर १९०७ को खुदीराम ने नारायणगढ़ रेलवे स्टेशन पर बंगाल के गवर्नर की विशेष ट्रेन पर हमला किया परन्तु गवर्नर बच गया। सन १९०८ में उन्होंने दो अंग्रेज अधिकारियों वाट्सन और पैम्फायल्ट फुलर पर बम से हमला किया लेकिन वे भी बच निकले।


☣ *न्यायाधीश किंग्जफोर्ड को मारने की योजना*

            मिदनापुर में ‘युगांतर’ नाम की क्रांतिकारियों की गुप्त संस्था के माध्यम से खुदीराम क्रांतिकार्य पहले ही में जुट चुके थे। १९०५ में लॉर्ड कर्जन ने जब बंगाल का विभाजन किया तो उसके विरोध में सडकों पर उतरे अनेकों भारतीयों को उस समय के कलकत्ता के मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड ने क्रूर दण्ड दिया। अन्य मामलों में भी उसने क्रान्तिकारियों को बहुत कष्ट दिया था। इसके परिणामस्वरूप किंग्जफोर्ड को पदोन्नति देकर मुजफ्फरपुर में सत्र न्यायाधीश के पद पर भेजा। ‘युगान्तर’ समिति कि एक गुप्त बैठक में किंग्जफोर्ड को ही मारने का निश्चय हुआ। इस कार्य हेतु खुदीराम तथा प्रफुल्लकुमार चाकी का चयन किया गया। खुदीराम को एक बम और पिस्तौल दी गयी। प्रफुल्लकुमार को भी एक पिस्तौल दी गयी। मुजफ्फरपुर में आने पर इन दोनों ने सबसे पहले किंग्जफोर्ड के बँगले की निगरानी की। उन्होंने उसकी बग्घी तथा उसके घोडे का रंग देख लिया। खुदीराम तो किंग्जफोर्ड को उसके कार्यालय में जाकर ठीक से देख भी आए


 💣 *अंग्रेज अत्याचारियों पर पहला बम*

               ३० अप्रैल १९०८ को ये दोनों नियोजित काम के लिये बाहर निकले और किंग्जफोर्ड के बँगले के बाहर घोडागाडी से उसके आने की राह देखने लगे। बँगले की निगरानी हेतु वहाँ मौजूद पुलिस के गुप्तचरों ने उन्हें हटाना भी चाहा परन्तु वे दोनाँ उन्हें योग्य उत्तर देकर वहीं रुके रहे। रात में साढे आठ बजे के आसपास क्लब से किंग्जफोर्ड की बग्घी के समान दिखने वाली गाडी आते हुए देखकर खुदीराम गाडी के पीछे भागने लगे। रास्ते में बहुत ही अँधेरा था। गाडी किंग्जफोर्ड के बँगले के सामने आते ही खुदीराम ने अँधेरे में ही आगे वाली बग्घी पर निशाना लगाकर जोर से बम फेंका। हिन्दुस्तान में इस पहले बम विस्फोट की आवाज उस रात तीन मील तक सुनाई दी और कुछ दिनों बाद तो उसकी आवाज इंग्लैंड तथा योरोप में भी सुनी गयी जब वहाँ इस घटना की खबर ने तहलका मचा दिया। यूँ तो खुदीराम ने किंग्जफोर्ड की गाडी समझकर बम फेंका था परन्तु उस दिन किंग्जफोर्ड थोडी देर से क्लब से बाहर आने के कारण बच गया। दैवयोग से गाडियाँ एक जैसी होने के कारण दो यूरोपियन स्त्रियों को अपने प्राण गँवाने पडे। खुदीराम तथा प्रफुल्लकुमार दोनों ही रातों - रात नंगे पैर भागते हुए गये और २४ मील दूर स्थित वैनी रेलवे स्टेशन पर जाकर ही विश्राम किया।

 

⛓️ *गिरफ्तारी*

              अंग्रेज पुलिस उनके पीछे लग गयी और वैनी रेलवे स्टेशन पर उन्हें घेर लिया। अपने को पुलिस से घिरा देख प्रफुल्लकुमार चाकी ने खुद को गोली मारकर अपनी शहादत दे दी जबकि खुदीराम पकड़े गये। ११ अगस्त १९०८ को उन्हें मुजफ्फरपुर जेल में फाँसी दे दी गयी। उस समय उनकी उम्र मात्र १८+ साल थी।

 

📿 *फाँसी का आलिंगन*

                   दूसरे दिन सन्देह होने पर प्रफुल्लकुमार चाकी को पुलिस पकडने गयी, तब उन्होंने स्वयं पर गोली चलाकर अपने प्राणार्पण कर दिये। खुदीराम को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस गिरफ्तारी का अन्त निश्चित ही था। ११ अगस्त १९०८ को भगवद्गीता हाथ में लेकर खुदीराम धैर्य के साथ खुशी - खुशी फाँसी चढ गये। किंग्जफोर्ड ने घबराकर नौकरी छोड दी और जिन क्रांतिकारियों को उसने कष्ट दिया था उनके भय से उसकी शीघ्र ही मौत भी हो गयी।

                फाँसी के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गये कि बंगाल के जुलाहे एक खास किस्म की धोती बुनने लगे। इतिहासवेत्ता शिरोल के अनुसार बंगाल के राष्ट्रवादियों के लिये वह वीर शहीद और अनुकरणीय हो गया। विद्यार्थियों तथा अन्य लोगों ने शोक मनाया। कई दिन तक स्कूल कालेज सभी बन्द रहे और नौजवान ऐसी धोती पहनने लगे, जिनकी किनारी पर खुदीराम लिखा होता था।


🗽 *स्मारक का उद्घाटन*

                     क्रान्तिवीर खुदीराम बोस का स्मारक बनाने की योजना कानपुर के युवकों ने बनाई और उनके पीछे असंख्य युवक इस स्वतन्त्रता-यज्ञ में आत्मार्पण करने के लिये आगे आये। इस प्रकार के अनेक क्रान्तिकारियों के त्याग की कोई सीमा नहीं थी।


🔮 *लोकप्रियता*

                    मुज़फ्फरपुर जेल में जिस मजिस्ट्रेट ने उन्हें फाँसी पर लटकाने का आदेश सुनाया था, उसने बाद में बताया कि खुदीराम बोस एक शेर के बच्चे की तरह निर्भीक होकर फाँसी के तख़्ते की ओर बढ़ा था। जब खुदीराम शहीद हुए थे तब उनकी आयु 18+ वर्ष थी। शहादत के बाद खुदीराम इतने लोकप्रिय हो गए कि बंगाल के जुलाहे उनके नाम की एक ख़ास किस्म की धोती बुनने लगे।

      उनकी शहादत से समूचे देश में देशभक्ति की लहर उमड़ पड़ी थी। उनके साहसिक योगदान को अमर करने के लिए गीत रचे गए और उनका बलिदान लोकगीतों के रूप में मुखरित हुआ। उनके सम्मान में भावपूर्ण गीतों की रचना हुई जिन्हें बंगाल के लोक गायक आज भी गाते हैं।

    

       

डॉ. राजेंद्र प्रसाद सहाय..


  

            *डॉ. राजेंद्र प्रसाद सहाय*

      (स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती)

                  *कार्यकाळ*

जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२

पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू

उपराष्ट्रपती - सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)

मागील - पदनिर्मिती

पुढील - सर्वपल्ली राधाकृष्णन

       *जन्म : ३ डिसेंबर १८८४*

जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)

      *मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३*

                    (पाटणा)

राजकीय पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पत्नी - राजवंशी देवी

व्यवसाय - वकिली

धर्म - हिंदू     

            डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.                                                                🔮 *जन्म*

           डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.


📙 *शैक्षणिक काळ*

          प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, १८९६ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.

             डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.


🔰 *कारकीर्द - शिक्षक*

             राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.


🎓 *वकील*

        १९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.


🇮🇳 *स्वातंत्र्य चळवळीतील कार्य*

             भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.

      गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.

             १९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.

           ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

                 २ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.


📚 *राजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके*

डॉ. राजेंद्र प्रसाद (संध्या शिरवाडकर)

राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचें ओझरते दर्शन (रा.प्र. कानिटकर)

    

    

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी..

                                                             *भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी*           (भारताचे ११ वे पंतप्रधान)    *जन्म : २५ ...