सामान्य ज्ञान 6

 1.औषधी वनस्पतींची राणी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

यानुंग जामोह लेगो, अरुणाचल प्रदेश

2.पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली आदिवासी महिला कोण ?

यानुंग जामोह लेगो, अरुणाचल प्रदेश

3. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवितात ?

हिरडा, आवळा व बेहडा

4. 'वासना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

इच्छा

5. भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता व पुरावा अधिनियम या तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारी देशातील पहिली प्रातिनिधिक संस्था कोणती ?

चंदीगड


6.सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती कोणी लिहिली ?

संत रामदास

7.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य पदग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घेतात ?

राज्यपाल

8.अपार (APAAR ) आयडीचा फुल फार्म काय आहे ?

ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री

9.'वत्स' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

वासरू बालक

10.दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?

अल्लाउद्दीन खिलजी 



11. भारतीय नौदल / नौसेना दिवस केव्हा साजरा केला जातो ?

४ डिसेंबर

12. २०२५ मध्ये 'खेलो इंडीया युथ गेम्स' चे यजमानपद कोणते राज्य भूषविणार आहे ?

बिहार

13. १९५० नंतर पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला ?

जम्मू काश्मीर

14.'वचक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

धाक, दरारा

15. इ. स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ?

अवंतिका गोखले


16. भारतातील पहिले सौर शहर (Solar city) कोणते बनले आहे ?

सांची, मध्यप्रदेश

17. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो ?

जिल्हाधिकारी 

18.घटना समितीने 'घटना मसुदा समिती' (ड्राफ्टींग कमिटी) केव्हा नेमली ?

२९ ऑगस्ट १९४७

19.'वंदन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात

20. जागतिक शेअर बाजारात सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे ?

अमेरिका (६०.५ टक्के)


 21.'Wings of Fire' हे पुस्तक कोणी लिहिले ?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

22.सध्या राज्यघटनेत कलमे, परिशिष्टे व भाग किती आहेत ?

४७० कलमे, १२ परिशिष्टे व २५ भाग

23.एखादी व्यक्ती भू - तलावर कोठे आहे, हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतो ?

जी. पी. एस. सिस्टिम

24.'वर्षा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

पाऊस

25.जागतिक शेअर बाजारात भारताचा वाटा किती टक्के आहे ?

 २ टक्के

26.आयपीएल इतिहासात सर्वात युवा खेळाडू (लहान खेळाडू) कोण ठरला आहे ?

वैभव सूर्यवंशी, भारत

27.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ राष्ट्रपतीपदी जवाबदारी सांभाळली ?

एम.हिदायतुल्ला

28.कटराजवळील वैष्णोदेवी मंदिर कोणत्या टेकडीवर आहे ?

त्रिकुट टेकडी

29.लावण्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

सौंदर्य

30.भारतीय राज्यघटना निर्मितीचा विचार पहिल्यांदा कोणत्या विचारवंताच्या विचारात दिसतो ?

डॉ. एम. एन. रॉय, प्रख्यात विचारवंत


भारतरत्न लता मंगेशकर...

    

 

         *भारतरत्न लता मंगेशकर*

             (एक महान गायिका)


टोपणनावे : लतादीदी

*जन्म : २८ सप्टेंबर १९२९*

(इंदूर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत)

*मृत्यू : ६ फेब्रुवारी, २०२२ (वय ९२)*

(मुंबई, महाराष्ट्र)

धर्म : हिंदू

नागरिकत्व : भारतीय

मूळ गाव : मंगेशी, गोवा

भाषा : मराठी, हिंदी भाषा

आई : शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर)

वडील : मास्टर दीनानाथ मंगेशकर

नातेवाईक : आशा भोसले

उषा मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर

मीना खडीकर

संगीत साधना

गुरू : दीनानाथ मंगेशकर

गायन प्रकार : कंठसंगीत गायन

संगीत कारकीर्द

कार्य : पार्श्वगायन, सुगम संगीत

पेशा : पार्श्वगायन

कारकिर्दीचा काळ : इ.स. १९४२ पासून

गौरव

विशेष उपाधी : गानकोकिळा

पुरस्कार : भारतरत्न(२००१)        लता मंगेशकर  या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

    लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.


त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.


लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.

💁🏻‍♀️ *बालपण*

लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.दीनानाथांचे वडील कर्हाडे ब्राह्मण व आई देवदासी (गोमंतक मराठा) होती.


लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूर ला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.

 🎥 *चित्रपटसृष्टीत कारकीर्द*

इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.


लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.


इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.


इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.


ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.


सुरूवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)

🔮 *१९५० च्या दशकात उत्कर्ष*

१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)


संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.


इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.

🔮 *इ.स. १९६०चे दशक*

१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.


इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.


इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.


२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.


इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.


इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.


१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.


लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.


अभिजात संगीतातले उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.


1970 चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.


तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट.                      1970 च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970 च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीती ना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले.


1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.


1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती.


लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे.


1970 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग".


1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले.


चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते.


1970 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता.

त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली.


1980 चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले.


1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली.


नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले.   1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.


1980 च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी की ना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने".

या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुम ना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहीं ना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मन ना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादा ना तोड", नंतर 2004 च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.


बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत).


मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80 च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां".

80 च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली.                      (1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी.


जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले.

1990 चे दशक 1990 च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले.


लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली.


लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत.


1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता.


चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004).


1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999).


एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली.


पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली.


1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वत:च्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत.


मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछ ना कहो" गायले: एक प्रेम कथा.


1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला.           त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे.


*2000 चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.* त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.


2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला.


तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती.


लता मंगेशकर यांचे "वादा ना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.


21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला.

2010 चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत.


14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से".

पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ... ना जाने क्यूं.


28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले.

2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते.


30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले.


1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, ​​महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्‍ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले.


1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले.                1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले.

1990 च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरूवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते.


2000 च्या दशकात, लतादिदीनी  युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी: नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे.

गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960 च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले.


1960 - राम राम पावना 1963 - मराठा तितुका मेळवावा 1963 - मोहित्यांची मंजुळा 1965 - साधी मानसे १९६९ - तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील "ऐरनिच्या देवा तुला" या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. १९५३ - वादळ (मराठी) १९५३ - झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती १९५५ - कांचन गंगा (हिंदी) १९९० - लेकीन... (हिंदी)


भारत सरकारचे पुरस्कार संपादन १९६९ - पद्मभूषण १९८९ - दादासाहेब फाळके पुरस्कार १९९९ - पद्मविभूषण 2001 - भारतरत्न 2008 - भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त "वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट" सन्मान .


🎞️ *महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार*                  1966 - साधी मानसासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1966 - 'आनंदघन' नावाने साधी मानस (मराठी) साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक 1977 - जैत रे जैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1997 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2001 - महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता).


⚜️ *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार*                         पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. तिला या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे.


1972 - परिचय चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


1974 - कोरा कागज चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 

1990 - लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार...                  पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली.


1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सोडण्याचा असामान्य हावभाव केला.


१९५९ - मधुमती मधील "आजा रे परदेसी". 1963 - बीस साल बाद मधील "कही दीप जले कही दिल" 1966 - "तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा" खंडन मधील 1970 - जीने की राह मधील "आप मुझे अच्छे लगने लगे" 1993 - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1994 - हम आपके है कौन मधील "दीदी तेरा देवर दिवाना" साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..! 2004 - फिल्मफेअर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

📜 *सन्मान*

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.

✍️ *लेखन*

लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.

📚 *लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके*

लता (इसाक मुजावर)

लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)

लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.

The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)

ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)

लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)

लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)

In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)

Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)

लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन

लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर

गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन

हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)

मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)

संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)

सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)

लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)



सामान्य ज्ञान 4

 1) भारतातील सर्वात उंच पक्षी कोणता ?

सारस पक्षी

2) 'जागतिक पाणथळ दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

2 फेब्रुवारी

3) गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो ?

ग्रामसेवक 

4) 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

सुरेख छान देखणे

5) १५० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो 

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

6) कान्हा राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

मध्य प्रदेश

7) कान्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?

एक जून 1955

8) बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?

जागतिक बालहक्क परिषद

9) 'सीमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

वेस मर्यादा शिव

10) ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू आहे ?

उत्तराखंड /उत्तरांचल

11) अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक केल्याचा नवा विक्रम कोणी केला ?

सुनीता विल्यम्स  62 तास 6 मिनिटे

12.२०२४ च्या सीके नायडू 'जीवन गौरव' पुरस्काराने कोणत्या क्रिकेटपटूला सन्मानित करण्यात आले ?

सचिन तेंडुलकर

13) समान नागरी कायदा (UCC) लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?

उत्तराखंड

14. 'सुरेल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

मंजुळ सुश्राव्य

15.सर्वाधिक १० वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?

मोरारजी देसाई

16.महाराज सयाजीराव गायकवाड यांचे पूर्ण नाव काय ?

 गोपाळ काशिनाथ गायकवाड

17.सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?

 छावा

18.अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती ?

 इटानगर


19.200 वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला ?

द्विशतक महोत्सव

.20. कुतुबमिनार हे प्रसिद्ध वास्तुशिल्प कोठे आहे ?

उत्तर - दिल्ली





साहित्यिकांची टोपणनावे

महाराष्ट्र हे संतांची लेखकांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक महान लेखक होऊन गेले आहे या लेखकांची टोपण नावे आपणास माहीत पाहिजे आहे त 

 साहित्यिकांची टोपणनावे 


टोपणनाव----------------लेखक


अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप

अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे

अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले

अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे

अमरशेख-------मेहबूब पठाण

अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर

आनंद-------वि.ल.बर्वे

आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे

कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

कुमुद-------स.अ.शुक्ल

कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर

कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी

केशवकुमार-------प्र.के. अत्रे

करिश्मा-------न.रा.फाटक

केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले

गदिमा-------ग.दि.माडगुळकर

गिरीश-------शंकर केशव कानेटकर

ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे

गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर

गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर

गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी

चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे

चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले

छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे

बालगंधर्व-------नारायणराव राजहंस

जीवन-------संजीवनी मराठे

ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी

तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले

तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी

दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे

द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार

जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार

दक्षकर्ण-------अशोक रानडे

दादुमिया-------दा.वि.नेने

दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे

दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे

दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर

धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर

धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर

नागेश-------नागेश गणेश नवरे

नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके

निशिगंध-------रा.श्री.जोग

नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी

पद्मा-------पद्मा विष्णू गोळे

पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई

पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील

पुष्पदंत-------प्र.न.जोशी

प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार

फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस

फरिश्ता-------न. रा. फाटक

बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर

बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम

बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण

बाबुलनाथ-------वि.शा.काळे

बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी

बी-------नारायण मुरलीधर गुप्ते

बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी

बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)

भटक्या-------प्रमोद नवलकर

भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये

भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे

भानुदास रोहेकर-------लीला भागवत

भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे

मकरंद-------बा.सी.मर्ढेकर

मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर

मनमोहन-------गोपाळ नरहर नातू

लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर

माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन

माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक

मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर

मधू दारूवाला-------म.पा.भावे

मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे

मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी

मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मंडणमित्र-------द.पा.खंबिरे

यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर

यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक

रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर

रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर

रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी

राजा ठकार-------नारायण गजानन आठवले

राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर

राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये

रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर

रूप-------प्रल्हाद वडेर

रे. टिळक-------नारायण वामन टिळक

लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी

लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक

लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख

वनमाळी-------वा.गो.मायदेव

वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट

वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस

वामन पंडित-------वामन नरहर शेखे

विजय मराठे-------ना.वि.काकतकर

विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर

विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर

विनोबा-------विनायक नरहर भावे

विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर

विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी

वशा-------वसंत हजरनीस

विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले.



नरवीर तानाजी काळोजीराव मालुसरे



                   *नरवीर*

    *तानाजी काळोजीराव मालुसरे*

         ( शिवरायांचे सरदार )


       *जन्म : इ.स. १६२६*

*(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*


       *वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०*

   *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*


टोपणनाव : तान्हाजी

अपत्ये : रायबा


तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.


🙎‍♂️ *बालपण*

                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.


🤺 *कामगिरी*

         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*

                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.


संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :


दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.

                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधून ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.

                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजीचे सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.

संदर्भ - शिवभारत

            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.


🤺 *कोंढाण्याची लढाई*

                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 

 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.


🗽 *तानाजीची स्मारके*

                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


📚 *पुस्तक*


दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे

गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे

नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक

तानाजी (अमर चित्र कथा -६८२)

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स

राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - प्र. के. घाणेकर

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे


🎖️ *पुरस्कार*


तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.


🎞️ *चित्रपट*


▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.

▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.



अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद..

 


अभिनंदन टीम इंडिया..


इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील महिला संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद होते.

टी20 विश्वचषकातील सलग विजयासाठी बीसीसीआयने भारतीय महिला अंडर19 संघाचे अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाला 5 कोटी रुपये आणि मुख्य प्रशिक्षक नुशीन अल खादीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे."

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक

                                    

आद्य क्रांतिवीर*

         *राजे उमाजी नाईक* 🤺


       *जन्म : 7सप्टेंबर 1791* 

         *(भिवडी, पुरंदर, पुणे)*


       *फाशी : 3 फेब्रुवारी 1832*

                   *(पुणे)*


            सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.

           सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1824 - 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या  हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण  उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.

          सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.

           ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

          सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, "सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल." यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या  शिवनाक यास रामोशांनी ठार केले.

            त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन  याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.

             रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर  संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.

             शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला. 

           1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला  अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.  त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे. 

          उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः  सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे, अशी त्याची इच्छा होती." 

          आम्हाला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीव नाही हे आपल्या देशाचे दुर्देव होय.


          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳



कल्पना चावला



         *कल्पना चावला*


     *जन्म : 17 मार्च 1962*

          (कर्नाल, हरियाणा)

*अंतराळात मृत्यू : 1 फेब्रुवारी*     

                              *2003*

       (टेक्सासवर अंतराळात)


कल्‍पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.


💁‍♀ *बालपण*

                  कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.


शिक्षण कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.


👫🏻 *विवाह*

            शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली.


🚀 *कार्य*

                   डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.


🔭 *कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र*


कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. लाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.


कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.


या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.


‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्‍नशील असतात.


✈ *केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रम*


वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.


कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.


🔭 *विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत*

कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.


थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.


पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्‍न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.


‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.


🔮 *कल्पना चावला यांचे मराठी सुविचार*


मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.


        

सामान्य ज्ञान.. 5

 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*


1.  गुजरात राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?

- आशियाई सिंह.


2..दाल हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- जम्मू काश्मीर.


3.. इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे ?

- कैरो.


4.. गुजगोष्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

- ना.सी.फडके.


5. प्रोटॉनचा शोध कोणी लावला ?

- अर्नस्ट रूदरफोर्ड.



6. काळे खंडाचा देश कोणता आहे ?

- आफ्रिका.


7. नाको हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- हिमाचल प्रदेश.


8.ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे ?

- ब्रासिलिया.


9. रथचक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

- श्री.ना.पेंडसे.


10.मध्यप्रदेश राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?

- बारासिंग.(हरण) 




गोंदिया जिल्हा बँकेत पदभरती 2025

 बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, गोंदिया येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 077 पदे भरली जात आहेत. ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. 30 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या 

www.gondiadccb.co.in

या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील.


पूर्णा जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://drive.google.com/file/d/1DJ0c4w-_2ocbBUsUej3DWtYd70-qcFXy/view?usp=drivesdk

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...