Main Menu
h 2
Labels
- Exam परीक्षा (2)
- jk (53)
- चालू घडामोडी (23)
- टेस्ट TEST (25)
- नोकरी जाहिरात (5)
- नोकरी जाहिरात.. (41)
- महान / विशेष व्यक्ती (48)
- विज्ञान विषयावर टेस्ट (16)
- विशेष प्रश्नमंजुषा (15)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (8)
जीवनसत्व अभावाने होणारे आजार आधारित टेस्ट
जीवनसत्वे आणि आजार - बहुपर्यायी चाचणी
मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व आधारित टेस्ट
मानवी जीवनात खनिजाचे महत्त्व - चाचणी
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट
शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर आधारित टेस्ट
शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट
शास्त्र आणि त्यांचा अभ्यास आधारित टेस्ट
भारतातील राज्ये आणि राजधानी..
भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानी यांची यादी खालीलप्रमाणे आहे (ऑक्टोबर 2025 पर्यंत):
### **भारतातील राज्ये आणि राजधान्या**:
1. **आंध्र प्रदेश** - अमरावती
2. **अरुणाचल प्रदेश** - ईटानगर
3. **आसाम** - दिसपूर
4. **बिहार** - पाटणा
5. **छत्तीसगड** - रायपूर
6. **गोवा** - पणजी
7. **गुजरात** - गांधीनगर
8. **हरियाणा** - चंदीगड
9. **हिमाचल प्रदेश** - शिमला
10. **झारखंड** - रांची
11. **कर्नाटक** - बेंगळुरू
12. **केरळ** - तिरुवनंतपुरम
13. **मध्य प्रदेश** - भोपाळ
14. **महाराष्ट्र** - मुंबई
15. **मणिपूर** - इंफाळ
16. **मेघालय** - शिलॉंग
17. **मिझोरम** - आइझॉल
18. **नागालँड** - कोहिमा
19. **ओडिशा** - भुवनेश्वर
20. **पंजाब** - चंदीगड
21. **राजस्थान** - जयपूर
22. **सिक्कीम** - गंगटोक
23. **तमिळनाडू** - चेन्नई
24. **तेलंगणा** - हैदराबाद
25. **त्रिपुरा** - अगरतळा
26. **उत्तर प्रदेश** - लखनौ
27. **उत्तराखंड** - देहराडून
28. **पश्चिम बंगाल** - कोलकाता
### **केंद्रशासित प्रदेश आणि राजधान्या**:
1. **अंदमान आणि निकोबार बेटे** - पोर्ट ब्लेअर
2. **चंदीगड** - चंदीगड
3. **दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव** - दीव
4. **दिल्ली** - नवी दिल्ली
5. **जम्मू आणि काश्मीर** - श्रीनगर (उन्हाळी), जम्मू (हिवाळी)
6. **लडाख** - लेह
7. **लक्षद्वीप** - कवरत्ती
8. **पुद्दुचेरी** - पुद्दुचेरी
ऑक्टोबर 2025 पर्यंतची आहे. भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश!
HSRP नंबर प्लेट बसण्यासाठी मुदत वाढ..
वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.
मुदतवाढ सरकारने चौथ्यांदा दिली असून, अजूनही राज्यातील अनेक वाहनमालकांनी ही आवश्यक नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरसोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुदतवाढीचा इतिहास
मूळ अंतिम तारीख: मार्च 2025
पहिली वाढ: एप्रिल 2025 अखेरपर्यंत
दुसरी वाढ: जून 2025 अखेरपर्यंत
तिसरी वाढ: 15 ऑगस्ट 2025 पर्यंत
चौथी आणि सध्याची वाढ: नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, देशातील सर्व वाहनांसाठी HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर ही प्लेट बसवावी लागेल.
भूमी अभिलेख विभाग भरती 2025
नगर भूमि अभिलेख कार्यालयात भरती निघाली आहे. मराठी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. परिक्षा द्या आणि एक चांगली नोकरी मिळवा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025
इच्छुकांनी अंतिम दिनांक यांच्या अगोदर फार्म भरून घ्यावा..
खालील वेबसाईटवरून फार्म भरावा
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/
https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी भेट द्या..
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2026..
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे सुरू
दिनांक 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत
फॉर्ममध्ये चुकीचे दुरुस्ती 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 2025
फार्मची फी 850
एस सी व एसटी साठी 750 रुपये
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ..
https://exams.nta.nic.in/sainik-school-society/https://nta.ac.in/
भारतरत्न नानाजी देशमुख...
*भारतरत्न नानाजी देशमुख*
(चंडिकादास अमृतराव देशमुख)
(सामाजिक कार्यकर्ता)
*जन्म : ११ ऑक्टोबर १९१६*
कडोळी, ता. हिंगोली जि. परभणी, महाराष्ट्र,
(आता - कडोळी, ता. जि. हिंगोली, महाराष्ट्र)
*मृत्यू : २७ फेब्रुवारी २०१०*
राष्ट्रीयत्व : भारतीय
नागरिकत्व : भारतीय
प्रशिक्षणसंस्था : बिर्ला तंत्रशास्त्र संस्था, पिलानी, राजस्थान
धर्म : हिंदू
वडील : अमृतराव देशमुख
पुरस्कार : भारतरत्न- (जाने २०१९) चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
💁🏻♂️ *चरित्र*
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.
प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.
पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.
या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.
चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.
आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.
📜 *पुरस्कार*
देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याची प्रतीके आधारित टेस्ट
महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट महाराष्ट्र राज्याची प्रतीके टेस्ट सूचना: प्रत्येक प्रश्नासाठी योग्य उत्...


